शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:59 IST

या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या पदवी परीक्षेत समन्वय नसल्याने नियोजनाचा फज्जा उडाला. यामुळे गुरुवारी आसनव्यवस्थेवरून मोठा गोंधळ झाला. याप्रकरणी परीक्षा विभाग व परीक्षा केंद्राने घडलेल्या घटनेचा प्राथमिक अहवालात काय घडले, याची माहिती आहे. हा अहवाल राज्य शासनाला पाठवू. या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

विजेयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एका बेंचवर तीन विद्यार्थी बसवले. मात्र, ते वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे होते. प्रिंटिंगला झालेला उशीर कुणामुळे झाला. अधिकचे विद्यार्थी त्या महाविद्यालयावर कसे पाठवले गेले. तिथे प्रवेशित विद्यार्थी व बैठक क्षमता किती आहे. काही वर्गखोल्या रिकाम्या होत्या, तर त्या का वापरात आणल्या नाहीत. यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षा संचालकांची सुनावणी घेतली जाईल. त्यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून दोन दिवसांत अहवाल आल्यावर आढळलेल्या दोषींवर कारवाई होईल. 

विद्यापीठाने समोर येऊन ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. ३ लाख परीक्षार्थी असून २२५ पैकी एकाच केंद्रावर ही घटना घडली. उर्वरित सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत झाली आहे. कोणताही परीक्षार्थी केंद्रावर आल्यावर तो परीक्षेपासून वंचित राहू नये, असे विद्यापीठाचे धोरण आहे. उत्तरपत्रिका वेगळ्या सील करा. मात्र, तांत्रिक कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. काॅपीमुक्तीसाठी घेतलेल्या निर्णयात होम सेंटर ठेवले नाही. त्यामुळे काही अडचणी आल्या. मात्र, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत. त्यासाठी विद्यापीठ काळजी घेईल, असेही कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षा