शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

थायी, बुद्धिस्ट टुरिझम वाढीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:10 IST

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.

ठळक मुद्देइकापोल पुलपीपट : बुद्धिस्ट सेंटर, बँकॉक विमानसेवेसाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांमुळे थायलंडहून औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थायी आणि बुद्धिस्ट टुरिझम वाढविण्यासाठी थायलंड सरकारतर्फे प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात थायी विहारे, बुद्धिस्ट सेंटरसह आगामी कालावधीत बँकॉकहून थेट औरंगाबाद हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केला जाईल, असे थायलंडचे काऊन्सिल जनरल इकापोल पुलपीपट म्हणाले.चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) उद्योजकांशी इकापोल पुलपीपट यांनी शनिवारी (दि.२१) संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआय’चे अध्यक्ष राम भोगले, नितीन गुप्ता, कमलेश धूत, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे (एमएसीसीआयए) सुहास दाशरथी, प्रसाद कोकीळ, टुरिझम प्रमोटर्स गील्डचे अध्यक्ष जसवंतसिंग, ‘मसिआ’चे अभय हंचनाळ, मनीष गुप्ता, अजय शहा, सुनील रायठ्ठा, केशव पारटकर, तनसुख झांबड आदी उपस्थित होते.राम भोगले, सुहास दाशरथी यांनी प्रारंभी थायलंड सरकारकडून अपेक्षित असलेल्या बाबी नमूद केल्या. औरंगाबाद ही उद्योग आणि पर्यटननगरी आहे. देश-विदेशांत विविध मालाची निर्यात केली जाते. मराठवाड्यातही उद्योगवाढीसाठी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.थायलंडमध्ये बौद्ध धर्म रुजलेला आहे. वेरूळ, अजिंठा लेणीला थायलंडचे पर्यटक भेट देतात. त्यामुळे भारत, श्रीलंका आणि थायलंड या बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनक्षेत्रात मोठ्या संधी आहेत. बँकॉकहून थेट औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत; परंतु थायलंडहून येणाºया विमानात किमान ८० टक्के प्रवासी हवेत, अशी अट भारत सरकारने घातली आहे. ही अट दूर केल्यास बँकॉक- औरंगाबादला थेट विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल,असे ते म्हणाले.श्रीलंकेतून औरंगाबादला थेट विमानसेवा सुरू करायची असल्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. याच धर्तीवर थायलंडहून औरंगाबादेत विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नसल्याचे भोगले यांनी इकापोल पुलपीपट यांच्या निदर्शनास आणून दिले.औरंगाबाद जिल्ह्यात थायलंड सरकार, थायी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून थायी विहार, बुद्धिस्ट सेंटर उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यातून पर्यटनवाढीस आणखी चालना मिळेल,असे ते म्हणाले.

टॅग्स :Buddha Cavesबौद्ध लेणीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन