शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भुकेपेक्षा थोड कमी खाण्यास प्राधान्य द्या; राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत तज्ज्ञांचा सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:55 IST

राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आरोग्या संबंधित अनेक सल्ले दिले.

ठळक मुद्देलक्ष्य ठेवून वजन कमी करा९० मिनिटांनंतर उभे राहाएका उपकरणामुळे १० किलो वजनवाढ 

औरंगाबाद : शहरीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मानवाचे शारीरिक श्रम कमी झाले आहेत. परिणामी, भारतीयांमध्ये पोट आणि कमरेभोवती चरबीचे प्रमाण वाढत आहे. २०२५ मध्ये वयाची २५ वर्षे पूर्ण करणारे स्थूलतेच्या समस्येला सामोरे जातील. त्यामुळे भुकेपेक्षा थोडे कमी खावे, ९० मिनिटांनंतर काही वेळ उभे राहावे, ज्यूस पिण्याऐवजी फळे खावीत, भरपूर पाणी प्यावे, असे अनेक सल्ले राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिले.

जागतिक  स्थूलता फे डरेशन, इंडोक्राईन सोसायटी आॅफ इंडिया, इंडियन मेडिक ल असोसिएशन, औरंगाबाद, फिजिशियन असोसिएशन, औरंगाबाद आणि औरंगाबाद अकॅ डमी आॅफ  पिडियाट्रिशयन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेस शुक्र वारी प्रारंभ झाला. परिषदेच्या पहिल्या दिवशी सर्व शाखांतील डॉक्टरांसाठी क ार्यशाळा झाली. याप्रसंगी जागतिक स्थूलता संस्थेच्या अध्यक्षा प्रो. डोना रेयान, डॉ. क्लॉडिया फॉक्स, अखिल भारतीय स्थूलताविषयक  प्रगत संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बन्सी साबू, पद्मश्री डॉ. शशांक  जोशी, अमेरिकेतील डॉ. राजाराम कर्णे, डॉ. हेमंत फ टाले, डॉ. प्रीती फ टाले, डॉ. मनोज चड्ढा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. क्लॉडिया फॉक्स म्हणाल्या की, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अधिकाधिक वेळ घालविला जातो. गरोदरपणात पोटावर चरबी (केंद्रीय स्थूलता) वाढते. त्यामुळे मातेकडून मुलाकडे स्थूलता जाण्याचा धोका असतो. भारतीय लोकांत पोटावरील चरबीचे प्रमाण अधिक आहे.

लक्ष्य ठेवून वजन कमी कराडॉ. डोना रेयान म्हणाल्या की, भारतीय आणि चिनी लोकांमध्ये पोट आणि कमरेभावती चरबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पोटावरील चरबीने हृदयरोग, मधुमेह, यकृत आणि रक्तदाबाचे आजार होतात. त्यामुळे भारतीयांचे आयुष्य घटत आहे. वजन नियंत्रणासाठी आहारात संतुलन राखले पाहिजे. एकाच वेळी पूर्ण वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ५ किलोप्रमाणे वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवा.

९० मिनिटांनंतर उभे राहाडॉ. साबू म्हणाले की, भारतात ४० ते ४५ वर्षांतील ८० टक्के लोकांना पोटावरील चरबीच्या म्हणजे केंद्रीय स्थूलतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय स्थूलता झाली की, पुढील १० वर्षांत मधुमेह, हृदयरोगाची लागण होते. सध्याच्या परिस्थितीने २०२५ मध्ये वयाची २५ वर्षे पूर्ण करणारे स्थूलतेच्या समस्येला सामोरे जातील. प्रत्येकाने ९० मिनिटांनंतर काही काळ उभे राहायला हवे. आपण स्थूल आहोत, याचा स्वीकार करून वजन नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे.

एका उपकरणामुळे १० किलो वजनवाढ डॉ. शशांक जोशी म्हणाले की, भारतात उत्पादन वाढविण्यासाठी कीटकनाशके, इंजेक्शनचा वापर केला जातो. त्याला आळा घातला पाहिजे. घरातील एका उपकरणामुळे १० किलो वजनवाढ होते. शरीरासाठी ते अपायकारक ठरते. ताणतणावत अधिक अन्नपदार्थ सेवन केले जाते. त्यातूनही चरबी वाढते. वेळेवर आणि कमी खाल्ले पाहिजे. म्हणजे भुकेपेक्षा थोडे कमी खाणे हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यdoctorडॉक्टर