शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा बाजारपेठेसाठीही चेतनादायी, देशभरात होणार ५० हजार कोटींची उलाढाल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 30, 2023 18:37 IST

देशभरात असेल दिवाळी सारखे वातावरण; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०० कोटींची होईल उलाढाल, देशातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा व्यापारी करणार ‘कॅश’

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर निर्माणाधीन असून, तिथे २२ जानेवारीला श्रीरामाच्या बालरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असेल. पुढील महिन्यात शहरवासीय ‘दिवाळी’ साजरी करण्यासाठी सज्ज झाले असून, हा सोहळा ‘कॅश’ करण्यासाठी व्यापारीही तयारीला लागले आहेत. २२ दिवसात बाजारपेठेत सुमारे ३०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

अयोध्येतील मंदिराच्या प्रतिकृतीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंतअयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपल्या देवघरात पूजेसाठी भाविक खरेदी करणार आहेत. उत्तर प्रदेशात एमडीएफपासून तयार केलेल्या अयोध्या मंदिराचे थ्री डी मॉडले शहरात विक्रीसाठी आणण्याकरिता अनेक व्यापाऱ्यांनी ऑर्डर दिल्या आहेत. यात ४ इंच, ५.५ इंच, ८ इंच व १२ इंच असे ४ आकारांत श्रीरामाचे मंदिर आहे. याशिवाय जय श्रीरामाचे टी-शर्ट, शर्ट, कुर्ता, टोप्या, फेटे तसेच श्रीरामाचे व मंदिराचे छायाचित्र असलेले ध्वज, पताका, सजावटीचे साहित्य, केशरी फुगे, पणत्या, लाईटिंग, रांगोळी, गुलाल, पूजेचे साहित्य, याशिवाय शोभायात्रेसाठी बँडपथक, डीजे, साऊंड सिस्टिम, एलईडी, अश्वरथापर्यंत सर्वांना मागणी असणार आहे.

देशभरात ५० हजार कोटींची उलाढालदेशभरातील सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना ‘कॅट’ (कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स)चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, कॅटच्या वतीने देशभरात ‘हर शहर अयोध्या; घरघर अयोध्या’ अभियान सुरू होईल. १ ते २२ जानेवारीदरम्यान व्यापारी आपली दुकाने श्रीराममय करतील. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रत्येक दुकानात जाऊन पत्रिका, अक्षता वाटप करणार आहेत. २२ दिवसात संपूर्ण देशात बाजारपेठेत ५० हजार कोटींची उलाढाल होणार आहे.

व्यापारी संघटनांची बैठकअयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. व्यापारीही अभियान राबविणार असून, अशा धार्मिक सोहळ्याने देशात मोठी उलाढाल होणार आहे. शहरातही ३०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा बूश मिळणार आहे.- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरAurangabadऔरंगाबाद