शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:09 IST

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावे, तर जालना जिल्ह्यातील उर्वरित ६५ गावांचा समावेश असून सध्या ही गावे आपले दैनंदिन व्यवहार अंधारातच पार पाडत आहेत.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एक मार्चपासून थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली. शहरात ६० हजार ग्राहकांकडे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या २० दिवसांच्या कालावधीत अवघी १४ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. शहरामधील थकबाकीदार ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यामुळे तब्बल २४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद  आणि जालना जिल्ह्यांमध्ये १ लाख ९७ हजार ५८९ ग्राहकांकडे  जवळपास १४४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद शहरात विभाग क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये ६० हजार ४९८ वीजग्राहकांकडे ७५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवतोडून परिश्रम घेत असून, थकबाकीदार ग्राहकांकडून १४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली होत नसल्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. १ मार्चपासून २४ हजार ३१४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात, तर ३७३ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी १३ लाख रुपये थकबाकी आहे.

ही गावे आहेत अंधारातकन्नड विभागांतर्गत अंबाला, भडली, खर्डी या तीन गावांचा संपूर्ण वीजपुरवठा कापण्यात आला आहे. याशिवाय जालना विभाग क्रमांक एकमध्ये काजळा, नांदापूर, वरखेडा, बेठलम, इंदलकरवाडी, धार, धावेडी, बोरगाव, बीबी, निरखेडा या दहा गावांचा आणि जालना विभाग क्रमांक दोनमध्ये शेरगोडा, अंगलगाव, डोलारा, पांडे पोखरी, सुरमगाव, हातडी, परवाडी, वडारवाडी, वाळखेड, घाणेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, विरेगाव, कोटला, गुंज, घोसी, बंगालेवाडी, मुधेगावा, चपडगाव, मानेपुरी, बोरगाव तांडा, भायगव्हाण, मंगरूळ, अंभोडा खुर्द, वीरगव्हाण, मुरूमखेडा, तालटोंडी, ठेगेवदगव्हाण, पांगरी वायाळ, वाधेगाव, वाघोडा, वाघला, सहद वडगाव, वरूड, वझर सरकटे, वाधोना, खडकी, जयपूर, भांबेरी, दोडगव्हाण, सौंदलगाव, डोमेगाव, रेणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, जालोरा, करंजळा, कुरण, डोमलगाव, चर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादJalanaजालना