शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:09 IST

औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावे, तर जालना जिल्ह्यातील उर्वरित ६५ गावांचा समावेश असून सध्या ही गावे आपले दैनंदिन व्यवहार अंधारातच पार पाडत आहेत.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एक मार्चपासून थकबाकीदार ग्राहकांच्या विरोधात महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली. शहरात ६० हजार ग्राहकांकडे ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या २० दिवसांच्या कालावधीत अवघी १४ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. शहरामधील थकबाकीदार ग्राहकांनी या मोहिमेला प्रतिसाद न दिल्यामुळे तब्बल २४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. औरंगाबाद  आणि जालना जिल्ह्यांमध्ये १ लाख ९७ हजार ५८९ ग्राहकांकडे  जवळपास १४४ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद शहरात विभाग क्रमांक एक आणि क्रमांक दोनमध्ये ६० हजार ४९८ वीजग्राहकांकडे ७५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवतोडून परिश्रम घेत असून, थकबाकीदार ग्राहकांकडून १४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश मिळविले आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली होत नसल्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. १ मार्चपासून २४ हजार ३१४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात, तर ३७३ ग्राहकांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी १३ लाख रुपये थकबाकी आहे.

ही गावे आहेत अंधारातकन्नड विभागांतर्गत अंबाला, भडली, खर्डी या तीन गावांचा संपूर्ण वीजपुरवठा कापण्यात आला आहे. याशिवाय जालना विभाग क्रमांक एकमध्ये काजळा, नांदापूर, वरखेडा, बेठलम, इंदलकरवाडी, धार, धावेडी, बोरगाव, बीबी, निरखेडा या दहा गावांचा आणि जालना विभाग क्रमांक दोनमध्ये शेरगोडा, अंगलगाव, डोलारा, पांडे पोखरी, सुरमगाव, हातडी, परवाडी, वडारवाडी, वाळखेड, घाणेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, विरेगाव, कोटला, गुंज, घोसी, बंगालेवाडी, मुधेगावा, चपडगाव, मानेपुरी, बोरगाव तांडा, भायगव्हाण, मंगरूळ, अंभोडा खुर्द, वीरगव्हाण, मुरूमखेडा, तालटोंडी, ठेगेवदगव्हाण, पांगरी वायाळ, वाधेगाव, वाघोडा, वाघला, सहद वडगाव, वरूड, वझर सरकटे, वाधोना, खडकी, जयपूर, भांबेरी, दोडगव्हाण, सौंदलगाव, डोमेगाव, रेणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, जालोरा, करंजळा, कुरण, डोमलगाव, चर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादJalanaजालना