शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता; संपर्कप्रमुखांसमोर केल्या अनेकांनी तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:07 IST

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद: राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. महाविकास आघाडीचे सरकार पडले. सरकारच्या विरोधात गेलेल्या गटात जिल्ह्यात पाच आमदारांचा समावेश असल्याने शिवसेना बालेकिल्ला ढासळला आहे. बालेकिल्ल्याचे वैभव पन्हा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत फेरबदल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समजली आहे.

माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी कधीही संपर्क ठेवला नाही. सनदी अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी संघटनेला हाताळले. त्यामुळे येथील शिवसेनेला घरघर लागण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची कैफियत पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. तसेच काही पदांवर दोन दशकांपासून तेच ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकाधिकारशाही वाढल्याबाबत बंडखोर आमदारांनी बंडखोरी करण्यापूर्वी व नंतर पक्षप्रमुखांच्या कानावर घातले होते. परंतु त्यात काहीही बदल झाला नाही. यामुळेही आमदारांमध्ये वाढलेली खदखद बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरली. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यातील अधिकारावरून देखील अनेक मतभेद आहेत. मनपा, जि. प. निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार झाल्याने फेरबदलाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे. पालकमंत्री, जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीमुळे जिल्ह्यातील आमदार वैतागले होते, अशा तक्रारी काही बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. यातून पक्ष काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या पंधरवड्यात शिवसेना आणि युवा सेनेत मोठे फेरबदल होतील. काहींची पक्षातून हकालपट्टी होईल, तर काही जणांना दुसऱ्या पदावर संधी मिळेल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद