शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता; संपर्कप्रमुखांसमोर केल्या अनेकांनी तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:07 IST

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद: राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. महाविकास आघाडीचे सरकार पडले. सरकारच्या विरोधात गेलेल्या गटात जिल्ह्यात पाच आमदारांचा समावेश असल्याने शिवसेना बालेकिल्ला ढासळला आहे. बालेकिल्ल्याचे वैभव पन्हा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत फेरबदल करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समजली आहे.

माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी कधीही संपर्क ठेवला नाही. सनदी अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी संघटनेला हाताळले. त्यामुळे येथील शिवसेनेला घरघर लागण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याची कैफियत पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. तसेच काही पदांवर दोन दशकांपासून तेच ते पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकाधिकारशाही वाढल्याबाबत बंडखोर आमदारांनी बंडखोरी करण्यापूर्वी व नंतर पक्षप्रमुखांच्या कानावर घातले होते. परंतु त्यात काहीही बदल झाला नाही. यामुळेही आमदारांमध्ये वाढलेली खदखद बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यास कारणीभूत ठरली. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यातील अधिकारावरून देखील अनेक मतभेद आहेत. मनपा, जि. प. निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार झाल्याने फेरबदलाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असे युद्ध पेटल्याने महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. आता यामागे काय कारणे आहेत, याची मीमांसा करण्यासाठी पक्षीय पातळीवर कानोसा घेण्यात येत आहे. पालकमंत्री, जिल्हाप्रमुखांच्या एकाधिकारशाहीमुळे जिल्ह्यातील आमदार वैतागले होते, अशा तक्रारी काही बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. यातून पक्ष काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या पंधरवड्यात शिवसेना आणि युवा सेनेत मोठे फेरबदल होतील. काहींची पक्षातून हकालपट्टी होईल, तर काही जणांना दुसऱ्या पदावर संधी मिळेल.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद