शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून,

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून, त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षांसोबत घरोबा करणार्‍या व्यक्तींकडे प्रचार यंत्रणा दिल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले. याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला, असे उत्तर शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी वानखेडे यांना दिले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी खा. सुभाष वानखेडे समर्थकांकडून पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याचा फंडा सुरू आहे. खरे तर गेल्या ३ वर्षांपासून वानखेडे यांच्या कार्यशैलीमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेचा उमेदवार बदलण्याची मागणी पक्ष प्रमुखांकडे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र वानखेडे यांनाच उमेदवारी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला; परंतु गेल्या पाच वर्षांपासून त्यांची शिवसैनिकांशी नाळ तुटली होती. काँग्रेस- राष्टÑवादीच्या आमदारांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी माजी आमदार व जिल्हा परिषदेवर टीका केली. जि.प. अध्यक्ष व सभापती निवडीत सदस्यांमध्ये फूट पाडून विरोधकांशी हातमिळवणी केली. या त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबी आहेत. तसेच वानखेडे यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणा आजी-माजी पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांच्या हातामध्ये दिली. त्याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला. त्यामुळे दुसर्‍यांवर गद्दारीचा आरोप करणार्‍यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे आत्मपरीक्षण करावे व निष्ठावान शिवसैनिकांवर आरोप करू नये, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकावर माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत देशमुख, बालाजी तांबोळी, सखाराम उबाळे, बालाजी पाटील बोंढारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. तसेच उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांचे नाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)