शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पराभवास वानखेडे स्वत:च जबाबदार

By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून,

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाला स्वत: माजी खा. सुभाष वानखेडे हेच जबाबदार असून, त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षांसोबत घरोबा करणार्‍या व्यक्तींकडे प्रचार यंत्रणा दिल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले. याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला, असे उत्तर शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी वानखेडे यांना दिले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी खा. सुभाष वानखेडे समर्थकांकडून पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याचा फंडा सुरू आहे. खरे तर गेल्या ३ वर्षांपासून वानखेडे यांच्या कार्यशैलीमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेचा उमेदवार बदलण्याची मागणी पक्ष प्रमुखांकडे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र वानखेडे यांनाच उमेदवारी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला; परंतु गेल्या पाच वर्षांपासून त्यांची शिवसैनिकांशी नाळ तुटली होती. काँग्रेस- राष्टÑवादीच्या आमदारांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी माजी आमदार व जिल्हा परिषदेवर टीका केली. जि.प. अध्यक्ष व सभापती निवडीत सदस्यांमध्ये फूट पाडून विरोधकांशी हातमिळवणी केली. या त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबी आहेत. तसेच वानखेडे यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणा आजी-माजी पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्या नेत्यांच्या हातामध्ये दिली. त्याचा परिपाक वानखेडे यांच्या पराभवात झाला. त्यामुळे दुसर्‍यांवर गद्दारीचा आरोप करणार्‍यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे आत्मपरीक्षण करावे व निष्ठावान शिवसैनिकांवर आरोप करू नये, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकावर माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत देशमुख, बालाजी तांबोळी, सखाराम उबाळे, बालाजी पाटील बोंढारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. तसेच उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांचे नाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)