शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

समाजात सकारात्मक बदल

By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST

तुळजापूर : चळवळीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मात्र, साहित्य संमेलने याबरोबरच विविध जनजागृतीपर

तुळजापूर : चळवळीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मात्र, साहित्य संमेलने याबरोबरच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे मागील काही वर्षांत समाजातील एकोपा वाढत असून, हा सकारात्मक बदल येणाऱ्या काळातही वेगाने होत राहील, असा विश्वास खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तुळजापूर येथे आयोजित २२ व्या अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्यस संमेलनाच्या समारोप प्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह दशरथ यादव, राजाभाऊ ओव्हाळ, आनंद पांडागळे आदींची उपस्थिती होती. नवोदितांचे हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने बहुजन विचारांचे असून, आम्ही ब्राह्मणविरोधी नाही तर, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या विचारांच्या विरोधात असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कार्यरत असून, हाच विचार ही परिषद मोठ्या ताकदीने पुढे नेत असल्याचे गौरवदगारही आठवले यांनी काढले. साहित्य म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर समाजातील समस्यांची उत्तरे अशा संमेलनात सापडली पाहिजेत. विविध प्रश्नांवर वैचारिक चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खोत यांचेही यावेळी भाषण झाले. पृथ्वी ही शेषनागावर उभारलेली नाही तर तर शेतकरी, श्रमिकांच्या घामावर उभी राहिली असल्याचे सांगत हाच शेतकरी आज अनेक संकटात सापडल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. (वार्ताहर)