शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राजकीय मंडळींनो, हे पाहा आलो, अतिक्रमणेही पाडली ! महापालिका विरुद्ध ‘राज’कारण शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:52 IST

Political leaders against the Aurangabad Municipal Corporation राजकीय मंडळींनी महापालिकेस गुलमंडीवर पाऊल ठेऊ नका असा इशारा दिला होता

ठळक मुद्दे कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली.सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली.

औरंगाबाद : गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना-भाजपच्या राजकीय मंडळींनी महापालिकेच्या नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्याला ‘गुलमंडीवर येऊच नका’ म्हणत बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि नगररचना विभागातील कर्मचारी ‘आम्ही आलो’ म्हणत दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील सर्व ओटे जमीनदोस्त करून शहरात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले.

त्याचे झाले असे की, महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून सोमवारी सायंकाळी गुलमंडीवर मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. त्यात दोन विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. ते पथकासमोर गयावया करीत रडत होते. तेथे उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा माणुसकीचा झरा फुटला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यास ‘गुलमंडीवर येऊ नका’ म्हणून बेदम मारहाण केली. घटनेनंतर सेनेचे माजी आ. किशनचंद तनवाणीही तेथे आले. रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

महापालिका प्रशासनाने सकाळीच गुलमंडीवर अतिक्रमण हटाव पथक, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी पाठवून दिले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्किंगनुसार बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत व्यापाऱ्यांचे सर्व ओटे जेसीबीने जमीनदोस्त केले. कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. लोखंडी शेड, पत्रे, ओटे मोठ्या संख्येने काढण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सहाय्यक जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी केली.

मारामारी अनैतिक, अशोभनीय, अवैधानिकमहाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. माजी सैनिकांच्या विरोधात तक्रार असेल तर ती रीतसर प्रशासनाकडे मांडली पाहिजे. प्रशासन चौकशी करून दोषींवर कारवाई करील. माजी सैनिकांनी नम्रपणे नागरिकांना वागणूक दिली पाहिजे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गुलमंडीवर नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत कल्पना नाही.- आस्तिक कुमार पाण्डेय, प्रशासक मनपा

प्रशासनाने सूडबुद्धीने काम करू नयेगुलमंडीवर मंगळवारी सकाळपासून व्यापाऱ्यांचे ओटे तोडण्यात येत आहेत. सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे. कारण नसताना ओटे कशासाठी तोडण्यात आले. शहरात सर्वत्र अतिक्रमणे आहेत. सगळीकडेच महापालिकेने कारवाई करावी. एकट्या गुलमंडीची निवड कशासाठी करण्यात आली? आता ओटे तोडले तर रोडचे काम कधी करणार? या भागातील रस्ते रुंद करून घ्यावेत यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.- किशनचंद तनवाणी, माजी आमदार.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद