शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राजकीय मंडळींनो, हे पाहा आलो, अतिक्रमणेही पाडली ! महापालिका विरुद्ध ‘राज’कारण शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:52 IST

Political leaders against the Aurangabad Municipal Corporation राजकीय मंडळींनी महापालिकेस गुलमंडीवर पाऊल ठेऊ नका असा इशारा दिला होता

ठळक मुद्दे कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली.सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली.

औरंगाबाद : गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना-भाजपच्या राजकीय मंडळींनी महापालिकेच्या नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्याला ‘गुलमंडीवर येऊच नका’ म्हणत बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि नगररचना विभागातील कर्मचारी ‘आम्ही आलो’ म्हणत दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील सर्व ओटे जमीनदोस्त करून शहरात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले.

त्याचे झाले असे की, महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून सोमवारी सायंकाळी गुलमंडीवर मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. त्यात दोन विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. ते पथकासमोर गयावया करीत रडत होते. तेथे उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा माणुसकीचा झरा फुटला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यास ‘गुलमंडीवर येऊ नका’ म्हणून बेदम मारहाण केली. घटनेनंतर सेनेचे माजी आ. किशनचंद तनवाणीही तेथे आले. रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

महापालिका प्रशासनाने सकाळीच गुलमंडीवर अतिक्रमण हटाव पथक, नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी पाठवून दिले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्किंगनुसार बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत व्यापाऱ्यांचे सर्व ओटे जेसीबीने जमीनदोस्त केले. कुंभारवाडा ते औरंगपुरा पोलीस चौकीपर्यंत लहान मोठी अतिक्रमणे पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. लोखंडी शेड, पत्रे, ओटे मोठ्या संख्येने काढण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सहाय्यक जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी केली.

मारामारी अनैतिक, अशोभनीय, अवैधानिकमहाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. माजी सैनिकांच्या विरोधात तक्रार असेल तर ती रीतसर प्रशासनाकडे मांडली पाहिजे. प्रशासन चौकशी करून दोषींवर कारवाई करील. माजी सैनिकांनी नम्रपणे नागरिकांना वागणूक दिली पाहिजे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गुलमंडीवर नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत कल्पना नाही.- आस्तिक कुमार पाण्डेय, प्रशासक मनपा

प्रशासनाने सूडबुद्धीने काम करू नयेगुलमंडीवर मंगळवारी सकाळपासून व्यापाऱ्यांचे ओटे तोडण्यात येत आहेत. सूडबुद्धीने प्रशासन वागत आहे. कारण नसताना ओटे कशासाठी तोडण्यात आले. शहरात सर्वत्र अतिक्रमणे आहेत. सगळीकडेच महापालिकेने कारवाई करावी. एकट्या गुलमंडीची निवड कशासाठी करण्यात आली? आता ओटे तोडले तर रोडचे काम कधी करणार? या भागातील रस्ते रुंद करून घ्यावेत यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.- किशनचंद तनवाणी, माजी आमदार.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद