शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

पोलिस बळ तोकडे

By admin | Updated: May 24, 2014 00:41 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याची लोकसंख्या कैक पटीने वाढली असून पोलिस बळ मात्र जुन्याच नियमानुसार कार्यरत आहे.

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याची लोकसंख्या कैक पटीने वाढली असून पोलिस बळ मात्र जुन्याच नियमानुसार कार्यरत आहे. त्यामुळे अपुर्‍या कर्मचार्‍यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी येऊन पडली असून, कामाचा ताणही वाढला आहे. परभणी जिल्ह्यात मागील दहा वर्षांच्या लोकसंख्येला अनुसरुनच पोलिस बळ मंजूर आहे. या दहा वर्षांमध्ये जिल्ह्याच्या लोकसंख्येत पटीने वाढ झाली. १८ लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात केवळ १६०० कर्मचार्‍यांवर कायदा व सुव्यवस्थेची भिस्त आहे. वाढलेली लोकसंख्या आणि गतिमान झालेल्या जीवनमानामुळे पोलिस कर्मचार्‍यांवर देखील ताण वाढला आहे. नऊ तालुके असलेल्या या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नव्याने दोन पोलिस ठाण्याची भर पडली, ही जमेची बाजू असली तरी आहे त्याच कर्मचार्‍यांतून या दोन्ही पोलिस ठाण्यांचा कारभार सांभाळावा लागत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, दररोज घडणार्‍या अपघाती घटना, गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांचा तपास लावताना पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना कसरत करावी लागते. या दैनंदिन घटना वगळता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि नागरिकांशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी कर्मचार्‍यांना वेळ कमी पडतो, अशी स्थिती आहे. परभणी जिल्ह्याला जुन्याच कोट्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यातही अनेक पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात परभणी मुख्यालय, परभणी शहर, परभणी ग्रामीण, पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि जिंतूर असे सात विभाग असून, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांचे या विभागावर नियंत्रण आहे. आतापर्यंत १७ पोलिस ठाण्यांमधून कारभार पाहिला जातो. त्यात चारठाणा आणि चुडावा या दोन पोलिस ठाण्यांची भर पडली आहे. पोलिस ठाण्यांची संख्या वाढली तरी पोलिस कर्मचार्‍यांची संख्या जिल्ह्यात वाढण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.