शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

एक पोलीस, एक गुन्हा; शहर पोलीस दलात नेल्सन योजना लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:17 IST

शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. 

ठळक मुद्देशहरातील प्रत्येक ठाण्यात सरासरी १०० ते १३० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि नाईक यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.  

- बापू सोळुंके  औरंगाबाद : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास दर्जेदार आणि सबळ पुराव्यासह करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. 

शहरातील प्रत्येक ठाण्यात सरासरी १०० ते १३० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि नाईक यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.   शहरातील क्रांतीचौक, सिटीचौक आणि एमआयडीसी वाळूजसारख्या मोठ्या ठाण्यात रोज सरासरी पाच ते सहा गुन्हे दाखल होतात, तर पुंडलिकनगरसारख्या नव्या ठाण्यात रोज एका गुन्ह्याची नोंद होते. ज्यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अनुभव आहे, अशाच कर्मचाऱ्यांकडे तपास सोपविण्यात येतो. प्रत्येक ठाण्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्के आहे. 

परिणामी, अशा तपासी अंमलदारांकडे आठ ते दहा गुन्हे तपासासाठी असतात. यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याचदा तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी न जाता ठाण्यात बसूनच पंचनामा करावा लागतो. तपास वेळेत करून आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल होत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नेल्सन योजना औरंगाबाद परिक्षेत्रात राबविली. 

दीड महिन्यापूर्वी येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी पहिल्या गुन्हे आढावा बैठकीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी नेल्सन योजनेनुसार एक गुन्हा एक पोलीस असे काम करण्याचे निर्देश दिले. एका पोलिसाकडे एका महिन्यात एकच गुन्हा असल्यास त्यांना तपास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि तपास योग्य पद्धतीने होऊन वेळेत दोषारोपपत्रही सादर करणे शक्य होईल. सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र न्यायालयात गेल्यास आरोपीला शिक्षा लागू शकते. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील पोलीस नाईक ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २०० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले.

काय आहे नेल्सन योजना?ठाण्यात कार्यरत तपासी अंमलदारांपैकी प्रत्येकी एका अंमलदाराला दर एक महिन्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा तपासाला देणे. एकच गुन्हा तपासासाठी असल्याने तो गुन्ह्याच्या घटनास्थळी वेळीच भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करेल, घटनास्थळावर आढळलेले पुरावे जमा करील, गुन्ह्याच्या तपासात वेळीच आरोपीला अटक करील. गुन्ह्यात आरोपींकडून काही जप्ती असेल तर ती करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवील. साक्षीदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे जाबजबाब नोंदवील आणि सबळ पुराव्यांसह वेळीच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करील.

शहरात सरासरी पाच हजार गुन्ह्यांची नोंदखून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, लुटमार, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, वाटमारी, अपहरण, खंडणी मागणे, मारामारी, विनयभंग, बंदूक बाळगणे, वाहनचोऱ्या, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे, सदोष मनुष्यवध, लाच घेणे, फसवणूक करणे, अनैतिक देह व्यापार ,जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, आदी गंभीर गुन्ह्यांची शहरातील संख्या सरासरी दोन हजार आहे. शिवाय अपघाताच्या गुन्ह्यांची संख्या दीड हजार, तर अन्य किरकोळ गुन्ह्यांची संख्या दोन हजार आहे. 

२०० पोलिसांना नाशिक येथे प्रशिक्षणपोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील दोनशे पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे नाशिक येथे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय आणखी तपास अधिकारी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाचे हे सत्र यापुढेही सुरूच राहणार आहे. - डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद