शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

औरंगाबादेत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:00 IST

पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते.

औरंगाबाद: बंजारा कॉलनी, बहादुरपुरा येथील रहिवासी पोलीस नाईक कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

उमाकांत पद्माकर पाटील (५२)असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  क्रांतीचौक  पोलिसांनी सांगितले की, उमाकांत पाटील हे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कार्यरत होते. उमाकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणाची केस कोर्टात प्रलंबित आहे. त्यांच्या या केसची सोमवारी सुनावणी होती. यामुळे  गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. रविवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. यांनतर ते झोपले.

दरम्यान पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास त्यांनी जिन्याखालील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. यांनतर शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी उमकांत यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

उमाकांत यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचा मुलगा दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी करतो. मुलगा नोकरीला लागल्यापासून उमाकांत आणि त्यांची पत्नीच घरी राहात होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत.   

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद