शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, पुंगळा गावातील ग्रामस्थांना रात्रीतून त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:36 IST

भगर खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखून उलटी, जुलाबाचा अनेकांना त्रास झाला.

जिंतूर (जि.परभणी) : उपवासाची भगर खाल्ल्याने गावातील वेगवेगळ्या कुटुंबातील २५ ते ३० जणांना विषबाधा झाली. यामध्ये गुरुवारी रात्री त्यांना जिंतूर शहरात शासकीस, खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नवरात्रीचे उपवास असल्याने पुंगळा गावातील वेगवेगळ्या कुटुंबाने गुरुवारी संध्याकाळी भगर खाल्ली. अचानक पोटात दुखत असल्याने व उलटी, जुलाब होत असल्याने अनेकांना त्रास झाला. हा त्रास सहन झाल्याने जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. ही संख्या वाढतच गेली असून, २५ ते ३० जणांना रात्री वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. यामध्ये पाच ते सहा लहान मुलांचा, १० ते १५ महिलांचा समावेश आहे.

यामध्ये अर्चना विष्णू देशमुख (३८), गुलाब नारायण मोरे (६८), लक्ष्मीबाई गुलाबराव मोरे (३७), उमा बापूराव मोरे (२८), अमोल अच्युतराव देशमुख (२९), वैष्णवी विष्णू देशमुख (१४), राणी राजेभाऊ देशमुख (३८), राजेभाऊ देशमुख (३८), आकाश अच्युतराव देशमुख (२७), इशिता राजेभाऊ देशमुख (८), रक्षिता राजेभाऊ देशमुख (सात), कोमल राजेभाऊ देशमुख (१०) हे सर्व ग्रामीण रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात २५ ते ३० जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. काहींची प्रकृती आता सुधारत असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाparabhaniपरभणी