शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, पुंगळा गावातील ग्रामस्थांना रात्रीतून त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:36 IST

भगर खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखून उलटी, जुलाबाचा अनेकांना त्रास झाला.

जिंतूर (जि.परभणी) : उपवासाची भगर खाल्ल्याने गावातील वेगवेगळ्या कुटुंबातील २५ ते ३० जणांना विषबाधा झाली. यामध्ये गुरुवारी रात्री त्यांना जिंतूर शहरात शासकीस, खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नवरात्रीचे उपवास असल्याने पुंगळा गावातील वेगवेगळ्या कुटुंबाने गुरुवारी संध्याकाळी भगर खाल्ली. अचानक पोटात दुखत असल्याने व उलटी, जुलाब होत असल्याने अनेकांना त्रास झाला. हा त्रास सहन झाल्याने जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. ही संख्या वाढतच गेली असून, २५ ते ३० जणांना रात्री वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. यामध्ये पाच ते सहा लहान मुलांचा, १० ते १५ महिलांचा समावेश आहे.

यामध्ये अर्चना विष्णू देशमुख (३८), गुलाब नारायण मोरे (६८), लक्ष्मीबाई गुलाबराव मोरे (३७), उमा बापूराव मोरे (२८), अमोल अच्युतराव देशमुख (२९), वैष्णवी विष्णू देशमुख (१४), राणी राजेभाऊ देशमुख (३८), राजेभाऊ देशमुख (३८), आकाश अच्युतराव देशमुख (२७), इशिता राजेभाऊ देशमुख (८), रक्षिता राजेभाऊ देशमुख (सात), कोमल राजेभाऊ देशमुख (१०) हे सर्व ग्रामीण रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात २५ ते ३० जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. काहींची प्रकृती आता सुधारत असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाparabhaniपरभणी