शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सुखद ! पोलिसांच्या कार्यक्षमतेसाठी नैमित्तिक रजा १२ वरून २० होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 19:26 IST

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय पांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाविषयीचे निर्णय घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना प्रस्ताव

- राम शिनगारेऔरंगाबाद : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यांना २० ते २२ शासकीय, सार्वजनिक सुट्या मिळतात; मात्र पोलिसांना बंदोबस्तामुळे या सुट्या मिळत नाहीत. त्यामुळे एका वर्षात असलेल्या नैमित्तिक रजा १२ वरून २० कराव्यात, यासाठीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांना मंगळवारी (दि.२४) दिला आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय पांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाविषयीचे निर्णय घेण्यात येत आहेत. राष्ट्रपती पोलीस पदकासाठीही लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पांडे यांनी केंद्रीय गृह विभागाकडे पाठविले होते. याशिवाय सध्या राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही अतिरिक्त लाँबिग आणि दबावाला बळी न पडता नियमानुसार बदल्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पांडे यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या नैमित्तिक रजा वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. त्यास अपर सचिवांची मान्यता मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १२ ऐवजी २० नैमित्तिक रजा मिळणार आहेत.

साडेआठ तासांपेक्षा अधिक कामराज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक साप्ताहिक सुटी मिळते. कामकाजाचा व्याप जास्त असल्यामुळे पोलीस निरीक्षक ते अंमलदार यांना प्रतिदिनी साडेआठ तासांपेक्षा अधिक काम करावे लागते. गणपती, नवरात्र, ईद बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्त आणि इतर बंदोबस्ताच्या काळात तर नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ कर्तव्यावर हजर राहावे लागते. शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतानाच साडेआठ तास काम करावे लागते, याकडेही महासंचालक पांडे यांनी लक्ष वेधले आहे.

शारीरिक, मानसिक आरोग्य जपणे आवश्यकसतत कामकाजाच्या व्यापामुळे पोलीस निरीक्षक ते पोलीस अंमलदार यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यांना कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि कुटुंबात अस्थिरता निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी अधिकारी, अंमलदारांच्या नैमित्तिक रजेत वाढ केली पाहिजे. यातून त्यांना मानसिक, शारीरिक आराम मिळून त्यांचे स्वास्थ्य चांगले राहील व त्यांना कुटुंबाला पुरेसा वेळ देता येऊन स्थैर्यता निर्माण होईल. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढून ते कर्तव्य चोख पार पाडू शकतील, असेही पांडे यांनी प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस