शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सुखद ! विशेष बाब म्हणून औरंगाबादचा नमामि गंगा योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 19:11 IST

दैदिप्यमान कामाची दखल घेत केंद्र शासनाने औरंगाबाद शहराचा नमामि गंगा योजनेत समावेश करण्यात येत असल्याची घोषणा केली. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील फक्त दोनच शहरांची निवडऔरंगाबाद शहरातील सुखना आणि खाम नदी पात्रांवर भविष्यात काम करण्यात येईल.१५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १५ कोटी रुपये भूमिगत गटार योजनेच्या प्रलंबीत कामांवर

औरंगाबाद : केंद्र शासनाने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी ‘नमामि गंगा’ (Namami Ganga ) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय ( Aurangabad Municipal Corporation ) यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र शासनाच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे गंगा नदी स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून गंगा नदीत दुषीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने गंगा स्वच्छतेचा विडा उचलला. गंगा नदी पात्राच्या आसपास असलेल्या प्रमुख शहरांचाच या योजनेत समावेश करण्यात आला. विशेष बाब म्हणून सोमवारी पुणे आणि औरंगाबादचा समावेश करण्यात आला. 

महापालिकेने मागील दहा महिन्यांपासून राज्य शासनाच्या ‘माझी वसंधुरा’ अभियानाअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेत नदीचे खोलीकरण, साफसफाई, पिचिंग, वृक्षारोपण, रंगरंगोटी, बाग विकसित करणे अशी कामे हाती घेतली आहेत. त्याचप्रमाणे भूमिगत गटार योजनेअंतर्गंत दुषीत पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले. २१० एमएलडी दुषीत पाण्यावर दररोज प्रक्रिया करण्यात येते. या दैदिप्यमान कामाची दखल घेत केंद्र शासनाने औरंगाबाद शहराचा नमामि गंगा योजनेत समावेश करण्यात येत असल्याची घोषणा केली. 

यासंदर्भात पत्रकारांशी बाेलताना पाण्डेय यांनी नमूद केले की, औरंगाबाद शहरातील सुखना आणि खाम नदी पात्रांवर भविष्यात काम करण्यात येईल. १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १५ कोटी रुपये भूमिगत गटार योजनेच्या प्रलंबीत कामांवर खर्च करण्यात येणार आहे. शहर विकास आराखड्यात दोन्ही नदी पात्रांना विशेष स्थान देण्यात येईल. पात्राच्या आसपास असलेली अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यापूर्वी पात्राची ब्ल्यु लाईन आणि रेड लाईन निश्चत केली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका