शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुखद ! रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठाच्या बियाणांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:45 IST

३८ क्विंटलच्या आसपास बियाणे विक्री विभागीय कृषी विस्तार केंद्रातून झाली.

ठळक मुद्देरबीच्या पेरणीची लगबगबिल, बियाण्यांच्या पिशव्या संभाळून ठेवा

औरंगाबाद : रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून, त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बियाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३८ क्विंटलच्या आसपास बियाणे विक्री विभागीय कृषी विस्तार केंद्रातून झाली. आता कोणतेच बियाणे शिल्लक उरलेले नाही.

गव्हाचे बियाणे उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी दिली. तर पेरणीत शेजारच्या शेतकऱ्यांच्या अनुकरणापेक्षा उपलब्ध साधनसामुग्री, पाणी, शेतीचा पोत याचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यापीठाच्या हरबरा २० क्विंटल, ज्वारी ६.५ क्विंटल, करडी ६ क्विंटल, जवस दोन क्विंटल, काबुली हरबरा ३ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्याची पूर्ण विक्री झाली. रब्बी ज्वारी आठवडाभरात थंडी वाढण्यापूर्वी पेरणी संपवावी तर ३१ नोव्हेंबरपूर्वी बागायती हरबरा पेरणी संपायला हवी अशी शिफारस कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.  तर गव्हाची पेरणीही ३० नोव्हेंबरपूर्वी करण्याच्या सूचना देताना कापसाचे अतिवृष्टीत खूप नुकसान झाले. तरीही फरदडसाठी मेहनत वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या पिकाचा विचार करण्याचा सल्ला ठोंबरे यांनी दिला आहे.  रब्बीचे नॅशनल सीड काॅर्पोरेशन, कृषी विभागाकडूनही बियाण्यांची उपलब्धता असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिल, बियाण्यांच्या पिशव्या संभाळून ठेवापेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा, पेरणीतच खत पेरणीही गरजेची आहे. तर तणनाशकाचा वापर करतांना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घेऊन ते संभाळून ठेवा. तसेच पेरणीवेळी बियाण्यांच्या पिशव्या, लेबलही संभाळून ठेवण्याच्या सूचना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ