शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सुखद ! पंधरा दिवसात जायकवाडी धरणात २ टीएमसी पाण्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:19 IST

१ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली 

ठळक मुद्देजायकवाडी जलाशयावर १६ जूनपर्यंत १५० मिमी  पाऊसयाशिवाय नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी धरणात येणार

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात गेल्या पंधरा दिवसात २ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. १ जून ते १६ जून दरम्यान नाथसागरावर १५० मि.मी पावसाची नोंद झाली असून यामुळे धरणातील जलसाठ्यात ५६ दलघमीने वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  गुरूवारी दाखल होण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी धरणात आवक सुरू झाल्याने  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जायकवाडी जलाशयावर १६ जून पर्यंत १५० मिमी  पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. धरण परिसरात एक जून रोजीच ४२ मिमी अशा दणकेबाज पावसाने प्रारंभ झाला होता. १ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली असल्याचे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून  ३ जून पासून गोदावरीत कमी जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी पात्रात  १२ उच्च पातळी बंधारे असून यात तांदळज , मजूर , दत्त सागर , हिंगणा , डाऊख , सडे शिंगवी , पुणतांबा , नेऊर , वांजरगांव , खानापूर , कमळापूर व नागमठान या बंधाऱ्याचा समावेश आहे.

या बंधाऱ्याची घटलेली पाणीपातळी भरून काढत नाशिकच्या पाण्याने बुधवारी वैजापूर तालुक्यातील नागमठान बंधारा ओलांडला असून गुरूवारी हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी नांदूरमधमेश्वर वेअर मधून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी नाशिक ते जायकवाडी दरम्यान गोदावरी नदीचे पात्र प्रवाही झाल्याने यापुढील काळात नाशिकचे पाणी विना अडथळा जायकवाडी धरणात जमा होईल असेही धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. 

सध्या धरणात ३७% जलसाठा धरणात एकूण जलसाठा ५४ टीएमसी असूनया पैकी उपयुक्त जलसाठा २८ टीएमसी आहे. जायकवाडी धरणात ३३% पेक्षा जास्त जलसाठा असल्यास सिंचनासाठी व पिण्यासाठी पूर्ण आवर्तने देता येतात. धरणातील जलसाठा आजच ३७% असल्याने यंदा धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी देताना कुठलीच अडचण भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस