शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

पर्यटन केंद्रस्थानी ठेवून छत्रपती संभाजीनगराचा विकास आराखडा बनावा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 7, 2024 19:55 IST

जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा-वेरूळ या जागतिक वारसाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा येथे आहे. तो टिकविण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

हे शहर राज्याची पर्यटन राजधानी म्हणून पुढे येण्यासाठी ‘पर्यटन’ केंद्रस्थानी ठेवून डेव्हलपमेंट प्लॅन (विकास आराखडा) तयार करणे आवश्यक आहे . ३० वर्षे झाले येथील डीपी प्लॅन तयार झाला नाही. यामुळे शहराचा कासवगतीने विकास होत आहे. राजस्थानप्रमाणे येथेही पर्यटन संस्कृती रुजण्यासाठी लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली. संघटनेच्या ‘क्रीडा महोत्सव’निमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरासह विविध विषयांवर ‘लोकमत’शी चर्चा केली.

प्रश्न : पर्यटन वाढीसाठी काय करावे?उत्तर : आपण विदेशात जेव्हा जातो तेव्हा तेथे मागील काही वर्षांत बांधलेले मोठी प्राणीसंग्रहालये, खास प्रदर्शन सेंटर याद्वारे ते पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरात प्राचीन वारसा आहे. तोच टिकवून ठेवणे व त्याचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. यासाठी डीपी प्लॅनमध्ये पर्यटनाच्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक असो वा चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून पर्यटक, प्रवासी हॉटेलात आला की, त्यास प्रथमदर्शनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे दिसली पाहिजेत, अशा प्रतिकृती तयार कराव्यात. त्या पर्यटनाचे क्यूआर कोड लावावेत. ते स्कॅन करून पर्यटकाला तेथील सर्व माहिती उपलब्ध होईल. ‘फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन’ यास म्हणतात. तेथून तो पर्यटक शहराच्या प्रेमात पडेल व सर्व ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी मुक्काम वाढवेल.

प्रश्न : पर्यटनाची राजधानी, भविष्यातील स्मार्ट सिटी ताळमेळ कसा बसेल?उत्तर : स्मार्ट सिटी म्हणजे गगनचुंबी इमारती असा अर्थ नाही. मुंबईत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या; पण त्यामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही. पर्यटनाची राजधानी व स्मार्ट सिटीचा ताळमेळ बसविण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या वास्तुशैलीची झलक तुम्हाला स्मार्ट सिटीमध्येसुद्धा दिसली पाहिजे. बिबीका मकबरा परिसरात रहिवासी वस्तीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली उंच इमारती उभारल्या व त्यास बाहेरून काचेचे तावदाने लावणे, हे शोभा देणार नाही. येथील ऐतिहासिक वारसाची जाणीव पर्यटकांना पदोपदी दिसली पाहिजे.

प्रश्न : जिल्ह्याचे अर्थचक्र पर्यटनाभोवती का फिरत नाही?उत्तर : गोवा राज्याचे अर्थचक्र फक्त पर्यटनाभोवती फिरते. येथे समुद्र सोडला तर जायकवाडी धरण, गोदावरी नदीपासून ते अजिंठा-वेरूळ, देवगिरी किल्ला, बिबीका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ गार्डन, नैसर्गिक, धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनाभोवती का फिरत नाही. कारण, त्यादृष्टीने गंभीर विचारमंथन झालेच नाही. त्या विचारमंथनातून पर्यटन संस्कृती निर्माण झाली नाही. कागदावरील ‘अतिथी देवो भव:’ हे शहरवासीयांच्या मनामनांत रुजले तर देशी-विदेशी पर्यटक या शहराकडे आकर्षित होतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटनBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा