शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'असली बायको नको रे देवा', १०८ उलट्या प्रदक्षिणा; औरंगाबादमध्ये पुरुषांकडून चक्क पिंपळपौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:35 IST

औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबाद

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी वडाच्या झाडाची पूजा करतात हे तर आपल्याला माहितच असेल. पण औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबादजवळील एका पत्नी पीडित आश्रमात पुरुषांकडून दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील ७ जन्म काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको असं म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत पूजन केलं. औरंगाबादच्या वाळूज परिसरात ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली. 

पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींकडून प्रातनिधिक निषेध या अनोख्या पद्धतीनं व्यक्त करण्यात येतो. "ज्यावेळी आम्ही आशेनं लग्न केलं की आपली पत्नी आपल्याला सांभाळून घेईल. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा भांडणं सुरू होतात आणि ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतं तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. आम्ही समाजातून बाहेर फेकले जातो आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आमच्याकडे पाहिलं जाऊ लागतं. पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तरी ती सुखाने जगू देत नाही", अशी व्यथा एका पत्नी पीडित पतीनं यावेळी मांडली. 

राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे व्रत सौभाग्यासाठी असून या दिवशी वट वृक्षाची पूजा केली जाते. बंगालमध्ये हेच व्रत याच दिवशी वडाची पूजा न करता पतीची पूजा करून साजरे केले जाते. पतील चंदनाची उटी आणि हार घालून साजरा करतात. या दिवशी यमदेवाची पूजा करून, फळांचा नैवेद्य दाखवून त्याला वडाची फांदी अर्पण करतात. 

वट पौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो व मुन्जाला साकडे घालतो कि "हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्या पेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव. खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले व ते कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही व त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अ बला झाला आहे, असं पत्नी पीडित पुरुष सांगतात. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद