शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

'असली बायको नको रे देवा', १०८ उलट्या प्रदक्षिणा; औरंगाबादमध्ये पुरुषांकडून चक्क पिंपळपौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:35 IST

औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबाद

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी वडाच्या झाडाची पूजा करतात हे तर आपल्याला माहितच असेल. पण औरंगाबादमध्ये एक वेगळीच पौर्णिमा साजरी केली गेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी औरंगाबादमध्ये आज पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. 

औरंगाबादजवळील एका पत्नी पीडित आश्रमात पुरुषांकडून दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. पुढील ७ जन्म काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको असं म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत पूजन केलं. औरंगाबादच्या वाळूज परिसरात ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली. 

पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींकडून प्रातनिधिक निषेध या अनोख्या पद्धतीनं व्यक्त करण्यात येतो. "ज्यावेळी आम्ही आशेनं लग्न केलं की आपली पत्नी आपल्याला सांभाळून घेईल. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा भांडणं सुरू होतात आणि ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतं तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. आम्ही समाजातून बाहेर फेकले जातो आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आमच्याकडे पाहिलं जाऊ लागतं. पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही आणि नांदली तरी ती सुखाने जगू देत नाही", अशी व्यथा एका पत्नी पीडित पतीनं यावेळी मांडली. 

राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे व्रत सौभाग्यासाठी असून या दिवशी वट वृक्षाची पूजा केली जाते. बंगालमध्ये हेच व्रत याच दिवशी वडाची पूजा न करता पतीची पूजा करून साजरे केले जाते. पतील चंदनाची उटी आणि हार घालून साजरा करतात. या दिवशी यमदेवाची पूजा करून, फळांचा नैवेद्य दाखवून त्याला वडाची फांदी अर्पण करतात. 

वट पौर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो व मुन्जाला साकडे घालतो कि "हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्या पेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव. खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले व ते कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही व त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अ बला झाला आहे, असं पत्नी पीडित पुरुष सांगतात. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद