शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

तीर्थक्षेत्रांचा विकास कागदावरच !

By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना किमान पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गतवर्षी सुमारे ७ कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात अवघे २ कोटी १२ लाख रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ८७ लाख रूपये अखिर्चत राहिल्याने तीर्थक्षेत्रांच्या विकासाला खिळ बसली आहे.जिल्हा परिषदेची कुठलीही बैठक वा सभा असो. त्यामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड सदस्यांतून केली जाते. निधी मिळत नाही, म्हणून सभागृह एक करणारे हे पुढारी निधी खर्चाबाबत मात्र, फारशे गंभीर नसल्याचे दिसून येते. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तनिवास, पोचरस्ता, परिसर विकास, पाणीपुरवठा आदी सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. असे असतानाही बांधकाम विभागाला अख्ख्या वर्षात सात कोटी रूपये खर्च करता आले नाहीत. वर्षभरात केवळ २ कोटी १२ लाख ३५ हजार रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी ८७ लाख रूपये अखर्चित राहिले आहेत. परिणामी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला एकप्रकारे खिळ बसल्याचेच यातून समोर आले आहे. त्यामुळे सदरील निधी अखर्चित राहण्यास जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता भाविकांतून व्यक्त होवू लागली आहे. कारण निधी मिळूनही संबंधित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अपेक्षित सुविधा निर्माण होवू शकलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)