शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांचा विकास कागदावरच !

By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना किमान पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गतवर्षी सुमारे ७ कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात अवघे २ कोटी १२ लाख रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ८७ लाख रूपये अखिर्चत राहिल्याने तीर्थक्षेत्रांच्या विकासाला खिळ बसली आहे.जिल्हा परिषदेची कुठलीही बैठक वा सभा असो. त्यामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड सदस्यांतून केली जाते. निधी मिळत नाही, म्हणून सभागृह एक करणारे हे पुढारी निधी खर्चाबाबत मात्र, फारशे गंभीर नसल्याचे दिसून येते. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तनिवास, पोचरस्ता, परिसर विकास, पाणीपुरवठा आदी सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. असे असतानाही बांधकाम विभागाला अख्ख्या वर्षात सात कोटी रूपये खर्च करता आले नाहीत. वर्षभरात केवळ २ कोटी १२ लाख ३५ हजार रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी ८७ लाख रूपये अखर्चित राहिले आहेत. परिणामी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला एकप्रकारे खिळ बसल्याचेच यातून समोर आले आहे. त्यामुळे सदरील निधी अखर्चित राहण्यास जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता भाविकांतून व्यक्त होवू लागली आहे. कारण निधी मिळूनही संबंधित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अपेक्षित सुविधा निर्माण होवू शकलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)