शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांची पीएच.डी नोंदणी धोक्यात? मुदत संपल्यामुळे नोंदणी रद्द होणार 

By राम शिनगारे | Updated: May 2, 2024 17:07 IST

या प्रकरणी विद्यापीठाच्या निर्णयाकडे हजारो संशोधकांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग संलग्न महाविद्यालयांमध्ये पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी धोक्यात आली आहे. पीएच.डी अधिनियमानुसार संशोधकांना संशोधनासाठी सहा वर्षांची दिलेली मुदत संपली असून, त्या कालावधीत संशोधन पूर्ण केले नाही, त्यांची नोंदणी आपोआप रद्द झाली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी मुदत संपल्यानंतर पुनर्नोंदणी किंवा वाढीव वेळेसाठी विद्यापीठाच्या संंबंधित प्राधिकरणांकडेही धाव घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने १५ डिसेंबर २०२० रोजी एम.फील, पीएच.डीच्या संदर्भातील सर्व नियमावलीचा १००९ हा अधिनियम मंजूर केला आहे. या अधिनियमानुसार पूर्णवेळ पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ३ वर्ष आणि जास्तीत जास्त ६ वर्षांमध्ये संशोधन पूर्ण करण्याचा नियम आहे. या अधिनियमाच्या पूर्वी विद्यापीठात ३ ऑक्टोबर २०१६ रोजीचा पीएच.डी अधिनियम लागू होता. त्यातही सहा वर्षांचीच जास्तीत जास्त मुदत दिलेली होती. मात्र, त्या अधिनियमात सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा हवा असेल तर संशोधन मान्यता समितीला (आरआरसी) मान्यता देण्यात आलेली होती. मात्र, २०२०च्या अधिनियमात अशी मुदतवाढ देण्याचा नियमच केलेला नसल्याचे दिसून आले आहे. तसेच हे दोन्ही अधिनियम लागू होण्यापूर्वीपासून विद्यापीठाकडे शेकडो विद्यार्थी अद्यापही पीएच.डीचे संशोधन करीत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काय होणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२०१४ पूर्वीची नोंदणी कालबाह्य का?विद्यापीठातील पीएच.डी विभागाकडे २०२४ पूर्वी नोंदणी केलेले काही संशोधन प्रबंध जमा झाले आहेत. काहींच्या संशोधन प्रबंधांचे बहि:स्थ अहवाल प्राप्त झाले असून, काहींचा अंतिम गोषवारा सादर केला आहे. या विद्यार्थ्यांची मुदत संपलेली असल्यामुळे त्यावर संबंधित विभाग काहीच निर्णय घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे २०१४ पूर्वी पीएच.डी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्ड ऑफ डीन, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेऊन संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संशोधनासाठी कालावधी निश्चित २०१४ पूर्वी नोंदणी केलेली आणि त्यांनी पुनर्नोंदणी केलेली नाही, अशी काही प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. विद्यापीठाच्या अधिनियमानुसार पीएच.डी संशोधनासाठी कालावधी निश्चित केलेला आहे. त्या कालावधीत संशोधन पूर्ण झाले नसेल तर संबंधित प्राधिकरणांकडून संशोधकांना पुनर्नोंदणी करावी लागेल. जे पुनर्नोंदणी करणार नाहीत, त्यांची नोंदणी आपोआप रद्दच होते.-डॉ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरु

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद