शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

९ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' अपघाताला टँकरमधील अर्धे पाणी कारणीभूत; आरटीओने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:55 IST

औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली.अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

बिडकीनकडून पाण्याचा खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) ११ मे रोजी नक्षत्रवाडीकडे येत होता. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार हा औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतला. त्याचवेळी समोरून रिक्षा येत होती.  

टँकरचालकाने ब्रेक न लावता रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले. या घटनेची आरटीओ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये टँकरमध्ये अर्धवट पाणी भरल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. 

टँकर पूर्ण रिकामे करावेटँकरमध्ये अर्धे पाणी भरलेले होते. यामुळे पाणी उसळून अपघाताला आमंत्रण मिळाले. यासंदर्भात पोलीस आणि परिवहन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. टँकरमध्ये अर्धे पाणी असेल तर सहजपणे ब्रेक लागत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. टँकर पूर्ण रिकामे केल्यानंतरच चालविले पाहिजे. अशा प्रकारे अर्र्धे पाणी भरणाऱ्या टँकरवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीRto officeआरटीओ ऑफीस