शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

९ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' अपघाताला टँकरमधील अर्धे पाणी कारणीभूत; आरटीओने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:55 IST

औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली.अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

बिडकीनकडून पाण्याचा खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) ११ मे रोजी नक्षत्रवाडीकडे येत होता. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार हा औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतला. त्याचवेळी समोरून रिक्षा येत होती.  

टँकरचालकाने ब्रेक न लावता रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले. या घटनेची आरटीओ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये टँकरमध्ये अर्धवट पाणी भरल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. 

टँकर पूर्ण रिकामे करावेटँकरमध्ये अर्धे पाणी भरलेले होते. यामुळे पाणी उसळून अपघाताला आमंत्रण मिळाले. यासंदर्भात पोलीस आणि परिवहन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. टँकरमध्ये अर्धे पाणी असेल तर सहजपणे ब्रेक लागत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. टँकर पूर्ण रिकामे केल्यानंतरच चालविले पाहिजे. अशा प्रकारे अर्र्धे पाणी भरणाऱ्या टँकरवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीRto officeआरटीओ ऑफीस