शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

९ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' अपघाताला टँकरमधील अर्धे पाणी कारणीभूत; आरटीओने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:55 IST

औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली.अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे. 

बिडकीनकडून पाण्याचा खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) ११ मे रोजी नक्षत्रवाडीकडे येत होता. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार हा औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला. डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतला. त्याचवेळी समोरून रिक्षा येत होती.  

टँकरचालकाने ब्रेक न लावता रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले. या घटनेची आरटीओ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये टँकरमध्ये अर्धवट पाणी भरल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. 

टँकर पूर्ण रिकामे करावेटँकरमध्ये अर्धे पाणी भरलेले होते. यामुळे पाणी उसळून अपघाताला आमंत्रण मिळाले. यासंदर्भात पोलीस आणि परिवहन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. टँकरमध्ये अर्धे पाणी असेल तर सहजपणे ब्रेक लागत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. टँकर पूर्ण रिकामे केल्यानंतरच चालविले पाहिजे. अशा प्रकारे अर्र्धे पाणी भरणाऱ्या टँकरवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीRto officeआरटीओ ऑफीस