शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

परीक्षा पास झाल्यानंतरच मिळणार वडापाव विकण्याला परवानगी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 19:50 IST

ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम राबविणे सुरू असून, चार तास प्रशिक्षण घेतल्यावर खाद्यपदार्थांविषयी घ्यावयाची काळजी आणि खबरदारीची भूमिका हा महत्त्वाचा विषय आहे. ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.

काय आहे मोहीम?सध्या वडापाव हा खाद्यपदार्थ सध्या जलद गतीने व सोयीस्कर मिळणारा नाष्टा असल्याने त्यात काही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेत योग्य प्रशिक्षणाची ही मोहीम राबविणे सुरू आहे.

आधी प्रशिक्षण, नंतर परीक्षाशहरात खाजगी संस्थेकडे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. परंतु खाद्यपदार्थ विक्री करताना त्याची गुणवत्ता जपणे निर्भेळ वस्तू ग्राहकांना दिले जावे म्हणून प्रशिक्षण आणि परीक्षा असा नियमच केला आहे.

कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार?खाद्यपदार्थ बनविण्यासाठी प्रशिक्षण परवाना असणे गरजेचे आहे. त्याशिवाय परवानाच तुम्हाला मिळणे शक्य नाही. जिल्ह्यात व शहरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात कधी ?खाजगी संस्थेकडे ही योजना राबविली असून, त्यानुसार ही फ्री आणि ऑनलाईन परीक्षा तुम्ही पास झाला तरच परवाना दिला जाणार आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

गुणवत्ता राखण्याचा उद्देश..तुम्ही सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्वक पदार्थ उपलब्ध करून दिलेच पाहिजे. त्यात दिलेले नियम व अटी पाळणे खूप गरजेचे आहे. कुणालाही त्रास होता कामा नये. गुणवत्ता राखण्याचा उद्देश आहे.- निखिल कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग