शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बागेत बहरला बारमाही आंबा !

By admin | Updated: December 15, 2014 00:44 IST

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही,

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे. लातूर शहरातील बोधे नगर हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला. परिसरात मोठ मोठ्या इमारतीही आहेत. रहिवाशांची संख्या अधिक असल्याने फारशी मोकळी जागा दिसून येत नाही. या ठिकाणी बोरी येथील कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज करकेली यांचे निवासस्थान आहे. त्यांनी घरासमोरच जवळपास १५ बाय २० च्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी एक आंब्याचे कलम त्यांनी लावले. सध्या आंब्याचे झाड मोठे झाले आहे. या आंब्याच्या झाडाला बारमाही मोहोर लागत आहे. त्याचबरोबर आंबेही लगडून गेली आहेत. जसजसे आंबे मोठे होतात, तसतसा झाडाला मोहोरही त्याच्या पटीत लागतो. हिवाळ्यात आंब्याचे उत्पादन सहसा कोठेही आढळून येत नाही. क्वचित ठिकाणी किरकोळ प्रमाणात आंबे लगडलेले असतात. इथे मात्र प्रा. करकेली यांच्या दारात बारा महिने आलेल्या पाहुण्यांना आंब्याचे दर्शन होते. कुतूहलाने अनेकजण झाडाच्या लागवडीपासून ते फळ लागेपर्यंतच्या मशागतीची चौकशीही करतात. कोठून तरी आणून लावलेले हे कलमाचे रोपटे आता वृक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)४दारातच आंब्याचे मोठे वृक्ष आहे. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस आंबे पडतात. मोहोरही बहरल्याचे ठळकपणे दिसते. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक दारात उभे राहून चौकशी करतात. घरात कोणी नसेल तर लहान मुले कुतूहलाने आंबे तोडून घेऊन जातात. अनोळखी लोकांकडून विचारपूस होत असल्याने नव्याने ओळखी वाढल्या आहेत. विचारपूस वाढल्याने नवे मित्रही जोडले गेले असल्याचे प्रा. बस्वराज करकेली यांनी सांगितले.