शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’

By विकास राऊत | Updated: March 9, 2024 15:10 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सा. बां. विभागांतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पांच्या निविदांमध्ये राजकारण शिरल्यामुळे सुमारे ४७५ कोटींच्या कामांना ग्रहण लागले आहे. वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून संपेपर्यंत या कामांना मुहूर्त लागणार नाही, अशी शक्यता आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे रखडलेल्या कामांच्या निविदेत लेबर कॉलनीतील प्रशासकीय संकुल १५० कोटी, सारथी इमारत व मराठा मुलांचे हाॅस्टेल १२५ कोटी, नगर नाका ते शरणापूर रस्ता २०० कोटी या कामांच्या निविदांचा समावेश आहे. प्रशासकीय संकुलाच्या निविदेचे प्रकरण कोर्टात गेले आहे. सारथीच्या इमारतीच्या निविदा शासनाकडे पाठवल्या आहेत. तर नगर नाका ते शरणापूर या सहापदरी रस्त्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत.

राजकीय दबावामुळे या निविदा लांबल्या...प्रशासकीय संकुल...लेबर कॉलनी येथील १३.५ एकर जागेवर प्रशासकीय संकुल तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी १४७ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. सा. बां. विभागाने १२५ कोटी रुपयांच्या कामासाठी टेंडर ऑक्टोबर २०२३ मध्ये मागवले. सहापैकी चार कंत्राटदार पात्र असताना एकाला अपात्र केल्याने तो कंत्राटदार कोर्टात गेला. कोर्टाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परिणामी, निविदांचे काम ठप्प पडले आहे.

नगर नाका ते शरणापूर रस्तानगर नाका ते शरणापूर हा रस्ता सहापदरी करणे प्रस्तावित आहे. छावणी एरियामध्ये ११०० मीटरचा पट्टा सोडून सहापदरी होईल. छावणीत एरियातून ७ मीटरचा रस्ता सध्या आहे. जर छावणीकडून परवानगी मिळाली नाही तर १० मीटरपर्यंत रस्ता रूंद केला जाईल. रस्त्यासाठी पूर्ण २०० कोटींची तरतूद आहे. तांत्रिक अडचणींमुळे नव्याने निविदा मागवल्या आहेत.

सारथी इमारत व हाॅस्टेलगजानन महाराज मंदिर परिसरातील कडा कार्यालय आवारात उपलब्ध जागेत सारथीची प्रशासकीय इमारत, मराठा मुलांसाठी ५०० क्षमतेचे हाॅस्टेल, लायब्ररी, मेसचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे १२५ कोटींचे हे काम असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा रद्द करून नव्याने मागवल्या आहेत. शासनानेच हे करण्यास सांगितल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे.

बांधकाम विभागाचा दावासगळ्याच निविदा नव्याने का मागवाव्या लागत आहेत. यामागे राजकीय दबाव आहे का? यावर बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे म्हणाले, शरणापूर ते नगर नाका रस्त्यासाठी दोनच कंत्राटदार निश्चित झाले. पहिल्यांदाच निविदा होत्या. त्यामुळे नव्याने मागवल्या आहेत. शरणापूर ते नगर नाका तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे नव्याने निविदा मागवल्या आहेत. नवीन प्रशासकीय संकुल निविदेत कोर्टाने स्थगिती दिली आहे. जॉइंट व्हेंचरशिपच्या मुद्यामुळे सारथी इमारत कामाबाबत शासनानेच फेरनिविदा करण्यास सांगितले होते. त्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद