शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’

By विकास राऊत | Updated: March 9, 2024 15:10 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सा. बां. विभागांतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पांच्या निविदांमध्ये राजकारण शिरल्यामुळे सुमारे ४७५ कोटींच्या कामांना ग्रहण लागले आहे. वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून संपेपर्यंत या कामांना मुहूर्त लागणार नाही, अशी शक्यता आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे रखडलेल्या कामांच्या निविदेत लेबर कॉलनीतील प्रशासकीय संकुल १५० कोटी, सारथी इमारत व मराठा मुलांचे हाॅस्टेल १२५ कोटी, नगर नाका ते शरणापूर रस्ता २०० कोटी या कामांच्या निविदांचा समावेश आहे. प्रशासकीय संकुलाच्या निविदेचे प्रकरण कोर्टात गेले आहे. सारथीच्या इमारतीच्या निविदा शासनाकडे पाठवल्या आहेत. तर नगर नाका ते शरणापूर या सहापदरी रस्त्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत.

राजकीय दबावामुळे या निविदा लांबल्या...प्रशासकीय संकुल...लेबर कॉलनी येथील १३.५ एकर जागेवर प्रशासकीय संकुल तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी १४७ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. सा. बां. विभागाने १२५ कोटी रुपयांच्या कामासाठी टेंडर ऑक्टोबर २०२३ मध्ये मागवले. सहापैकी चार कंत्राटदार पात्र असताना एकाला अपात्र केल्याने तो कंत्राटदार कोर्टात गेला. कोर्टाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परिणामी, निविदांचे काम ठप्प पडले आहे.

नगर नाका ते शरणापूर रस्तानगर नाका ते शरणापूर हा रस्ता सहापदरी करणे प्रस्तावित आहे. छावणी एरियामध्ये ११०० मीटरचा पट्टा सोडून सहापदरी होईल. छावणीत एरियातून ७ मीटरचा रस्ता सध्या आहे. जर छावणीकडून परवानगी मिळाली नाही तर १० मीटरपर्यंत रस्ता रूंद केला जाईल. रस्त्यासाठी पूर्ण २०० कोटींची तरतूद आहे. तांत्रिक अडचणींमुळे नव्याने निविदा मागवल्या आहेत.

सारथी इमारत व हाॅस्टेलगजानन महाराज मंदिर परिसरातील कडा कार्यालय आवारात उपलब्ध जागेत सारथीची प्रशासकीय इमारत, मराठा मुलांसाठी ५०० क्षमतेचे हाॅस्टेल, लायब्ररी, मेसचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे १२५ कोटींचे हे काम असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा रद्द करून नव्याने मागवल्या आहेत. शासनानेच हे करण्यास सांगितल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे.

बांधकाम विभागाचा दावासगळ्याच निविदा नव्याने का मागवाव्या लागत आहेत. यामागे राजकीय दबाव आहे का? यावर बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे म्हणाले, शरणापूर ते नगर नाका रस्त्यासाठी दोनच कंत्राटदार निश्चित झाले. पहिल्यांदाच निविदा होत्या. त्यामुळे नव्याने मागवल्या आहेत. शरणापूर ते नगर नाका तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे नव्याने निविदा मागवल्या आहेत. नवीन प्रशासकीय संकुल निविदेत कोर्टाने स्थगिती दिली आहे. जॉइंट व्हेंचरशिपच्या मुद्यामुळे सारथी इमारत कामाबाबत शासनानेच फेरनिविदा करण्यास सांगितले होते. त्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद