शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

वॉटरग्रीडच्या बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:08 IST

मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.

ठळक मुद्देअनास्था : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रकल्प होत असताना इच्छाशक्तीचा अभाव

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी योजना विभागात होण्याचे संकेत असतानाच लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्यामुळे या योजनेबाबतचे गौडबंगाल वाढले आहे.या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री, विधान परिषद, विधानसभा सदस्य, जि.प. अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. भाऊसाहेब चिकटगावकर व अन्य एक विधानसभा सदस्याची व परभणी जि.प. अध्यक्षांची बैठकीला हजेरी होती. पालकमंत्री, आमदार, महापौर यांना निमंत्रित केलेले असताना ते का आले नाहीत, यावर पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सांगितले, वॉटरग्रीडच्या बैठकीसाठी सर्वांना फोन केले होते; परंतु अनेक जण आले नाहीत.आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीडच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात उजनीतील पाणी मांजरा धरणात आणून मराठवाड्यातील ४० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात इसापूरचे पाणी उर्ध्व मानार धरणक्षेत्रात आणणे, तसेच जायकवाडीवरील धरणाक्षेत्रातून पाणी आणणे. जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणक्षेत्रात नेणे. ८ जिल्ह्यांतील ६० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. यासाठी ८ हजार ५०० कोटी असा १५ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प होता. १५ कोटी (डीपीआर) सविस्तर प्रकल्प अहवालासाठी तरतूद करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित ग्रीड करण्याच्या सूचना केल्या.शिवसेनेची बैठकीकडे पाठआजवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही बैठकीला हजेरी लावणारे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, महापौर, जि.प. अध्यक्षांनी मराठवाडा वॉटरग्रीडच्या बैठकीकडे पाठ फिरविली. १५ दिवसांनंतर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMember of parliamentखासदारMLAआमदार