शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

वॉटरग्रीडच्या बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:08 IST

मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.

ठळक मुद्देअनास्था : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रकल्प होत असताना इच्छाशक्तीचा अभाव

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी योजना विभागात होण्याचे संकेत असतानाच लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्यामुळे या योजनेबाबतचे गौडबंगाल वाढले आहे.या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री, विधान परिषद, विधानसभा सदस्य, जि.प. अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. भाऊसाहेब चिकटगावकर व अन्य एक विधानसभा सदस्याची व परभणी जि.प. अध्यक्षांची बैठकीला हजेरी होती. पालकमंत्री, आमदार, महापौर यांना निमंत्रित केलेले असताना ते का आले नाहीत, यावर पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सांगितले, वॉटरग्रीडच्या बैठकीसाठी सर्वांना फोन केले होते; परंतु अनेक जण आले नाहीत.आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीडच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात उजनीतील पाणी मांजरा धरणात आणून मराठवाड्यातील ४० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात इसापूरचे पाणी उर्ध्व मानार धरणक्षेत्रात आणणे, तसेच जायकवाडीवरील धरणाक्षेत्रातून पाणी आणणे. जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणक्षेत्रात नेणे. ८ जिल्ह्यांतील ६० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. यासाठी ८ हजार ५०० कोटी असा १५ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प होता. १५ कोटी (डीपीआर) सविस्तर प्रकल्प अहवालासाठी तरतूद करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित ग्रीड करण्याच्या सूचना केल्या.शिवसेनेची बैठकीकडे पाठआजवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही बैठकीला हजेरी लावणारे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, महापौर, जि.प. अध्यक्षांनी मराठवाडा वॉटरग्रीडच्या बैठकीकडे पाठ फिरविली. १५ दिवसांनंतर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMember of parliamentखासदारMLAआमदार