शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

असुविधांविरोधात लवकरच जनआंदोलन; महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:34 IST

निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी भाजपने इच्छुकांसह संघटना पदाधिकाऱ्यांमधील चैतन्य कायम ठेवण्यासाठी तयारी म्हणून बैठक घेतली.

औरंगाबाद : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने रविवारी रणनीती आखणारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील असुविधांविरोधात जनआंदोलन करण्याचा प्राथमिक निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या गोटातून समजली आहे.

जिल्हा परिषद व मनपा निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होतील की नाही हे सांगता येत नाही; परंतु या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी भाजपने इच्छुकांसह संघटना पदाधिकाऱ्यांमधील चैतन्य कायम ठेवण्यासाठी तयारी म्हणून बैठक घेतली. उस्मानपुरा येथील पक्षाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीत भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. बैठक गोपनीय होती, त्यामुळे त्याबाबत फारशी माहिती कुणालाही देण्यात आली नव्हती.

ग्रामीण भागातील रस्त्यांसह पाणीपुरवठा, महावितरणकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आदी मुद्दे आहेत. तर शहरात अनियमित पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वॉर्डनिहाय अंतर्गत रस्त्यांसह गुंठेवारी नियमितीकरण शुल्काचे मुद्दे आहेत. यात गुंठेवारी वसाहतींत नागरिकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या रकमेविरोधात भाजपने मोर्चाचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबरमध्येच मोर्चा काढण्यात येणार होता; परंतु त्यावेळी शहराध्यक्षांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्यामुळे मोर्चाचे नियोजन झाले नाही. आता हा मोर्चा नवीन वर्षांत काढण्याची तयारी करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेतून मनपा निवडणुका होणार असल्यामुळे भाजपला सत्तेपर्यंत जाण्याचे समीकरण कसे जुळविता येईल, यासाठी इच्छुक उमेदवारांशी रविवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन वर्षात भाजप शहर व ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणार असून, त्यासाठी पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपा