शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंस्कृतीमध्ये सोवळं-ओवळं नसतं

By admin | Updated: November 25, 2015 23:19 IST

लातूर : ‘लोकसंस्कृतीमध्ये सोवळं-ओवळं नसतं. प्रतिगामी आणि घातक परंपरा असतानाही लोकसाहित्य माणूसकेंद्री राहिले आहे

लातूर : ‘लोकसंस्कृतीमध्ये सोवळं-ओवळं नसतं. प्रतिगामी आणि घातक परंपरा असतानाही लोकसाहित्य माणूसकेंद्री राहिले आहे. त्यातल्या दोषांना काढून मानवकेंद्रित विचारधारेने लोकसाहित्याचा अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी लातूर येथे बोलताना केले.येथील डॉ. रामशेट्टी शेटकार व प्रा. बालाजी शिंदे यांनी संपादित केलेल्या ‘लोकसाहित्य : काल, आज आणि उद्या’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सरस्वती संगीत महाविद्यालयात आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राम बोरगावकर, ललिता सबनीस, डॉ. विठ्ठल लहाने, मंगेश बोरगावकर, डॉ़राजशेखर सोलापुरे, प्राचार्य डॉ.आर.एम. चौधरी, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. अशोक नारनवरे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. सबनीस पुढे म्हणाले, लोकसंस्कृती ही लोकसाहित्यातून व्यक्त होत असते. लोकसाहित्यावरील ६७२ पानांचे संपादित केलेले नव्या व जुन्या साहित्यिकांचा समन्वय असलेले बहुदा मराठी साहित्यातील हे पहिलेच पुस्तक असावे. याने सर्व जाती-धर्माच्या लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा वाचकांपुढे मांडला आहे. यात ८६ लेखकांचे लेख आहेत. लोक साहित्यात धर्मनिरपेक्षता ठासून भरलेली असते. धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन खऱ्या अर्थाने लोकसंस्कृती व्यक्त करणारे हे पुस्तक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी डॉ. लहाने यांनी आई-वडिलांची सेवा करा. आईचे चरणस्पर्श करा. त्यातून मिळणारा आनंद हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. त्याचा दैनंदिन आनंद घ्या, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. रामशेट्टी शेटकार, प्रा. बालाजी शिंदे, डॉ. मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. अशोक नारनवरे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. राम बोरगावकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुदाम पवार यांनी केले. आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. श्रीपाल सबनीस हे निवडीनंतर पहिल्यांदाच मातृभूमीत आले. सरस्वती संगीत कला महाविद्यालयाच्या कलाभूमीत रंगलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भूमिपुत्राचा निवडीनंतर पहिलाच सत्कार झाला. तो मनोभावे स्वीकारत श्रीपाल सबनीस यांनी कलावंताला कलावंताची कदर असते. हारतुऱ्यांच्या सत्कारापेक्षाही पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संमेलनाध्यक्ष म्हणून मला महत्त्वाचा वाटतो. त्यात मायभूमीतील हा सोहळा आणि सत्कार याने मी भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.