शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:10 IST

जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

औरंगाबाद : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर पोलीस दलात आणखी एका विभागाची भर टाकण्यात आली, असे असले तरी प्रत्यक्षात मात्र गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणारी कारवाई निम्म्यावर आल्याचे समोर आले. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडते आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज, छावणी, सिडको आणि शहर विभाग क्रमांक १ आणि २, असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत. १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत ही कारवाई निम्मीच आहे. गतवर्षी जानेवारी ते आॅगस्टदरम्यान नियम मोडणाऱ्या १ लाख २० हजार ५०८ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून ३ कोटी १९ लाख ७२ हजार ३५० रुपये दंड वसूल केला होता. 

एका वाहतूक विभागाची पडली भरगतवर्षी शहरात चार वाहतूक विभाग होते. यावर्षी यात आणखी एका विभागाची भर पडली. त्यासाठी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारीही देण्यात आले. असे असले तरी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसून येते.

अडीच हजार वाहन- चालकांनी भरला आॅनलाईन दंडसेफ सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोस्टामार्फत घरपोच नोटिसा पाठविण्याचा उपक्रम एक महिन्यापूर्वी सुरू झाला. वाहनचालकांना अ‍ॅक्सिस बँक आणि पोस्टात दंडाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. वाहनचालकांस घरपोच नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कोर्टात खटला दाखल केला जातो. महिनाभरात २ हजार ६२४ वाहनचालकांनी १ लाख ७७ हजार ५१८ रुपये दंड बँक आणि पोस्टात जमा केला.

बंदोबस्तामुळे कारवाईला वेळच नाहीजानेवारीपासून आॅगस्टपर्यंत शहरात झालेल्या विविध दंगलींच्या काळात वाहतूक पोलीस बंदोबस्तात होते. परिणामी, कारवाई घटली.-एच.एस. भापकर, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस