शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

औरंगाबादमध्ये ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:10 IST

जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

औरंगाबाद : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर पोलीस दलात आणखी एका विभागाची भर टाकण्यात आली, असे असले तरी प्रत्यक्षात मात्र गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणारी कारवाई निम्म्यावर आल्याचे समोर आले. जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. 

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडते आहे. वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज, छावणी, सिडको आणि शहर विभाग क्रमांक १ आणि २, असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आहेत. १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत ही कारवाई निम्मीच आहे. गतवर्षी जानेवारी ते आॅगस्टदरम्यान नियम मोडणाऱ्या १ लाख २० हजार ५०८ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून ३ कोटी १९ लाख ७२ हजार ३५० रुपये दंड वसूल केला होता. 

एका वाहतूक विभागाची पडली भरगतवर्षी शहरात चार वाहतूक विभाग होते. यावर्षी यात आणखी एका विभागाची भर पडली. त्यासाठी पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारीही देण्यात आले. असे असले तरी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसून येते.

अडीच हजार वाहन- चालकांनी भरला आॅनलाईन दंडसेफ सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोस्टामार्फत घरपोच नोटिसा पाठविण्याचा उपक्रम एक महिन्यापूर्वी सुरू झाला. वाहनचालकांना अ‍ॅक्सिस बँक आणि पोस्टात दंडाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. वाहनचालकांस घरपोच नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कोर्टात खटला दाखल केला जातो. महिनाभरात २ हजार ६२४ वाहनचालकांनी १ लाख ७७ हजार ५१८ रुपये दंड बँक आणि पोस्टात जमा केला.

बंदोबस्तामुळे कारवाईला वेळच नाहीजानेवारीपासून आॅगस्टपर्यंत शहरात झालेल्या विविध दंगलींच्या काळात वाहतूक पोलीस बंदोबस्तात होते. परिणामी, कारवाई घटली.-एच.एस. भापकर, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस