शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर; औरंगाबाद जिल्हातील रस्त्यांच्या कामांना मिळाल्या प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:42 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आलेला ‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर करण्यात जिल्हा परिषदेने यशस्वी कामगिरी केली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आलेला ‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर करण्यात जिल्हा परिषदेने यशस्वी कामगिरी केली. विलंबाने का होईना अखेर ‘पीसीआय इंडेक्स’वर शिक्कामोर्तब झाल्यामुळे रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाची सुमारे ३६ कोटी रुपयांची कामे मार्च अखेरपूर्वी सुरू होतील. या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाल्या आहेत.

ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ‘पीसीआय इंडेक्स’ अर्थात रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम तयार करण्याचे चालू आर्थिक वर्षामध्ये शासनाचे आदेश होते. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडून रस्त्यांच्या कामाचा प्राधान्यक्रम तयार करण्यात आलेला नव्हता. ‘पीसीआय इंडेक्स’च्या निकषानुसार अगोदर सर्वाधिक खराब रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असते. जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्तावित रस्ते हे ‘पीसीआय इंडेक्स’मध्ये समाविष्ट नसतील, तर त्या रस्त्यांसाठी तरतूद केलेला निधी जिल्हा परिषदेला खर्च करता येणार नाही. त्यामुळे केवळ ‘पीसीआय इंडेक्स’ अभावी रस्त्यांच्या कामांसाठी प्राप्त निधी परत करण्याची नामुष्की ओढावली जाऊ नये म्हणून जि.प. बांधकाम समितीने यंदाच्या आर्थिक वर्षात ‘पीसीआय इंडेक्स’चा नियम शिथिल करावा, असा ठराव संमत करून तो शासनाला पाठविण्यात आला होता; परंतु अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सातत्याने उपअभियंत्यांकडे पाठपुरावा करून ‘पीसीआय इंडेक्स’ पूर्णत्वाकडे नेत त्यावर शिक्कामोर्तब केले.

या संदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील यांनी सांगितले की, ‘पीसीआय इंडेक्स’मुळे रस्त्यांच्या कामांना गती मिळाली असून, कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी दोन लेखाशीर्ष खाली १२ व २४ कोटी असे एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ‘पीसीआय इंडेक्स’ अभावी तो निधी जिल्हा परिषदेला खर्च करता आला नसता. त्यामुळे युद्धपातळीवर ‘पीसीआय इंडेक्स’ तयार करण्यात आला. आता प्राप्त निधीतून मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यास कसलीही अडचण येणार नाही.

भाजप सदस्य आक्रमकया संदर्भात भाजप सदस्य एल. जी. गायकवाड म्हणाले की, सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीने भाजप जि.प. सदस्यांवर निधी वाटपामध्ये अन्याय केला आहे. सत्ताधार्‍यांनी जरी पक्षपाती भूमिका घेतली असली तरी प्रशासनाने मात्र, सदरील कामांची यादी रोखायला पाहिजे होती. सत्ताधारी शब्दाला जागले नाहीत. आम्ही गुरुवारी यासंदर्भात मुंबईमध्ये पालकमंत्र्यांची भेट घेऊन जि.प. मधील हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर आम्ही येत्या आठ दिवसांत जि.प.मध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद