शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर; औरंगाबाद जिल्हातील रस्त्यांच्या कामांना मिळाल्या प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:42 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आलेला ‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर करण्यात जिल्हा परिषदेने यशस्वी कामगिरी केली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आलेला ‘पीसीआय इंडेक्स’चा अडथळा दूर करण्यात जिल्हा परिषदेने यशस्वी कामगिरी केली. विलंबाने का होईना अखेर ‘पीसीआय इंडेक्स’वर शिक्कामोर्तब झाल्यामुळे रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाची सुमारे ३६ कोटी रुपयांची कामे मार्च अखेरपूर्वी सुरू होतील. या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाल्या आहेत.

ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ‘पीसीआय इंडेक्स’ अर्थात रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम तयार करण्याचे चालू आर्थिक वर्षामध्ये शासनाचे आदेश होते. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडून रस्त्यांच्या कामाचा प्राधान्यक्रम तयार करण्यात आलेला नव्हता. ‘पीसीआय इंडेक्स’च्या निकषानुसार अगोदर सर्वाधिक खराब रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असते. जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्तावित रस्ते हे ‘पीसीआय इंडेक्स’मध्ये समाविष्ट नसतील, तर त्या रस्त्यांसाठी तरतूद केलेला निधी जिल्हा परिषदेला खर्च करता येणार नाही. त्यामुळे केवळ ‘पीसीआय इंडेक्स’ अभावी रस्त्यांच्या कामांसाठी प्राप्त निधी परत करण्याची नामुष्की ओढावली जाऊ नये म्हणून जि.प. बांधकाम समितीने यंदाच्या आर्थिक वर्षात ‘पीसीआय इंडेक्स’चा नियम शिथिल करावा, असा ठराव संमत करून तो शासनाला पाठविण्यात आला होता; परंतु अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सातत्याने उपअभियंत्यांकडे पाठपुरावा करून ‘पीसीआय इंडेक्स’ पूर्णत्वाकडे नेत त्यावर शिक्कामोर्तब केले.

या संदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील यांनी सांगितले की, ‘पीसीआय इंडेक्स’मुळे रस्त्यांच्या कामांना गती मिळाली असून, कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी दोन लेखाशीर्ष खाली १२ व २४ कोटी असे एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ‘पीसीआय इंडेक्स’ अभावी तो निधी जिल्हा परिषदेला खर्च करता आला नसता. त्यामुळे युद्धपातळीवर ‘पीसीआय इंडेक्स’ तयार करण्यात आला. आता प्राप्त निधीतून मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्यास कसलीही अडचण येणार नाही.

भाजप सदस्य आक्रमकया संदर्भात भाजप सदस्य एल. जी. गायकवाड म्हणाले की, सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीने भाजप जि.प. सदस्यांवर निधी वाटपामध्ये अन्याय केला आहे. सत्ताधार्‍यांनी जरी पक्षपाती भूमिका घेतली असली तरी प्रशासनाने मात्र, सदरील कामांची यादी रोखायला पाहिजे होती. सत्ताधारी शब्दाला जागले नाहीत. आम्ही गुरुवारी यासंदर्भात मुंबईमध्ये पालकमंत्र्यांची भेट घेऊन जि.प. मधील हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. त्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर आम्ही येत्या आठ दिवसांत जि.प.मध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद