शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

निवडणूक कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:01 IST

शासकीय सहायता निधीत देणगी देण्याची अनेकांनी व्यक्त केली इच्छा 

ठळक मुद्देरोहयोवरील मजुरांना २०६ रुपये मानधन निवडणुकीत काम करणाऱ्यांना २५० रुपये मानधन आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मानधन तुटपुंजे असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून उमटत आहेत. तुटपुंज्या मानधनावरून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. रोहयोवरील मजुरांना २०६, तर निवडणुकीत काम करणाऱ्यांना २५० रुपये मानधन आहे. हे मानधन नको म्हणून अनेकांनी शासकीय सहायता निधीत ते जमा करून टाकण्याचे मतही जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तुटपुंजे मानधन आणि तेही वेळेवर नाही, शिवाय निवडणुकीचे काम करताना सक्ती, वरिष्ठांकडून होणारा शाब्दिक व मानसिक छळ. या सगळ्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होतो आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हतबल असून, राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली त्यांनी निमूटपणे निवडणुकीचे काम केले. आता मतमोजणीसाठी कर्मचारी निमूटपणे काम करणार आहेत. कमी मानधन आणि ते मिळविण्यासाठी त्रास अधिक असल्याने काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला तुटपुंजे मानधन नको, कुठे तरी देणगी देऊन टाका, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला प्रशिक्षण शिबिरात सुनावले. 

२३ एप्रिल रोजी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २०२१ मतदान केंद्रांबाहेर नियुक्त करण्यात आलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी, अतिरिक्त केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), अंगणवाडी सहायक, पोलीस आदींचा समावेश होता, या कर्मचाऱ्यांना एका दिवसाचे केवळ २५० रुपये मानधन देण्यात आले, तर शिपायांची १५० रुपयांवर बोळवण केली. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये केंद्र अध्यक्षांना प्रशिक्षण व मतदान दिवस असे ४ दिवसांचे मिळून दररोज ३५० रुपये मानधन देण्यात आले, तर केंद्रावरील सर्व मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवसाचे २५० रुपये देण्यात आले.

धोका जास्त; मानधन कमीनिवडणूक प्रक्रियेत काम करताना धोका जास्त आणि मानधन कमी अशी अवस्था झाली आहे. या कामात वर्ग १ व वर्ग २ दर्जाचे अधिकारी नियुक्त केले असून, त्यांना दीड हजार रुपये मानधन देण्यात आले. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ते तुटपुंजे मानधन देणगी स्वरूपात देण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले, मानधन सर्वत्र समान आहे, कुठेही कमी-जास्त असा प्रकार नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादfundsनिधी