शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; औरंगाबाद मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:13 IST

महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्देमालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी दिला

औरंगाबाद : महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला. मोठ्या थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करा, असे आदेश देण्यात आले.

मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एका बैठकीत दिला. वॉर्ड अधिकार्‍यांना जोमाने काम करण्याचा सल्ला आयुक्तांनी आपल्या पद्धतीने दिला. वसुली कमी झाल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांचा पगार तीन महिने होणार नाही, असा इशारा देण्यात आला. वर्षअखेरीस सर्वात कमी वसुली असलेल्या अधिकार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

पाणीपट्टीत ८० कोटींची तूटसमांतर जलवाहिनीचे काम करणार्‍या कंपनीने अवघ्या १४ महिन्यांमध्ये शहरातून तब्बल ९० कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. मागील वर्षी महापालिकेने पाणीपट्टी फक्त ३६ कोटी वसूल केली. यंदा तर वसुलीने अधिकच तळ गाठला आहे. नऊ महिन्यांमध्ये फक्त ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. येणार्‍या अडीच महिन्यांमध्ये जास्तीत जास्त पाणीपट्टी वसूल करण्याचे मोठे आव्हान मनपाच्या वॉर्ड अधिकार्‍यांसमोर आहे.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाAurangabadऔरंगाबाद