शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कर वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; औरंगाबाद मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:13 IST

महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्देमालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी दिला

औरंगाबाद : महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला. मोठ्या थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करा, असे आदेश देण्यात आले.

मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एका बैठकीत दिला. वॉर्ड अधिकार्‍यांना जोमाने काम करण्याचा सल्ला आयुक्तांनी आपल्या पद्धतीने दिला. वसुली कमी झाल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांचा पगार तीन महिने होणार नाही, असा इशारा देण्यात आला. वर्षअखेरीस सर्वात कमी वसुली असलेल्या अधिकार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

पाणीपट्टीत ८० कोटींची तूटसमांतर जलवाहिनीचे काम करणार्‍या कंपनीने अवघ्या १४ महिन्यांमध्ये शहरातून तब्बल ९० कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. मागील वर्षी महापालिकेने पाणीपट्टी फक्त ३६ कोटी वसूल केली. यंदा तर वसुलीने अधिकच तळ गाठला आहे. नऊ महिन्यांमध्ये फक्त ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. येणार्‍या अडीच महिन्यांमध्ये जास्तीत जास्त पाणीपट्टी वसूल करण्याचे मोठे आव्हान मनपाच्या वॉर्ड अधिकार्‍यांसमोर आहे.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाAurangabadऔरंगाबाद