शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

रुग्णांचे ‘टेन्शन’ दूर करणाऱ्या तज्ज्ञांनाही येतो ताण; अनेक माध्यमांतून जपतात मानसिक आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:10 IST

मनोरुग्णांची मने बरे करणाऱ्या डाॅक्टरांचेही मानसिक आरोग्य कधी तरी बिघडते. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून वेळीच बाहेर पडतात

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : स्पर्धेचे युग, धावपळीची जीवनशैली यासह अनेक गोष्टींमुळे नैराश्य, ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. यातूनच अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडते. अशा रुग्णांचे ‘टेन्शन’ दूर करण्याचे काम मानसोपचार तज्ज्ञ करतात. परंतु या मानसोपचार तज्ज्ञांना कधीच ताणतणाव, नैराश्य येत नसेल, असा अनेकांचा समज असेल. परंतु मनोरुग्णांची मने बरे करणाऱ्या डाॅक्टरांचेही मानसिक आरोग्य कधी तरी बिघडते. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून वेळीच बाहेर पडत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय असो की खाजगी रुग्णालये; मानसोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशनातून लोकांचे मनोविकार दूर करतात. परंतु त्यांनाही कधी ताणतणाव, नैराश्याला सामोरे जावे लागते का, तेव्हा ते काय करतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविषयी घाटीतील मनोविकृती चिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, अनेक कारणांनी मलाही ताणतणाव येताे. परंतु त्याविषयी इतरांशी मी मनमोकळे बोलतो. ज्याच्यावर विश्वास आहे, त्यासमोर व्यक्त होतो. जुनी गाणी ऐकतो. त्यातून ताण दूर होण्यास मदत होते. मनोविकार तज्ज्ञ डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, माणूस म्हणून ताण येतोच. मात्र, घेतलेल्या शिक्षणाचा आणि करीत असलेल्या रुग्णसेवेचा मलाही फायदा होतो. ताणाचा शोध घेऊन त्यावर मात केली जाते.

मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. संदीप सिसोदे म्हणाले, दैनंदिन जीवनात आम्हालाही कधी ना कधी ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्याची अनेक कारणे असतात. परंतु त्याविषयी इतरांशी बोलले तर फायदा होतो. डाॅ. अतिक पाल म्हणाले, ताणाविषयी कोणाशी बोलले नाही तर त्याचे प्रमाण वाढतच जाते. मित्रपरिवारासोबत बोलून मोकळा होतो.

मन मोकळे करणे फायद्याचेप्रत्येक व्यक्तीत भावना असतात. ताणतणाव, नैराश्य या भावनाच आहेत. या भावना आल्यानंतर त्याचे नियोजन कसे केले जाते, हे महत्त्वाचे असते. ताणतणाव, नैराश्य आल्यानंतर मी मित्रांशी, कुटुंबीयांशी मनमोकळे बोलतो. गाणे ऐकतो. फिरायला जातो.- डाॅ. महेश मरकड, चिकित्सालयीन मानस तज्ज्ञ

परिस्थितीशी जुळवून घेतोकाही गोष्टींमुळे ताण येतो. परंतु परिस्थितीशी जुळवून घेतले की, ताण दूर होतो. ताणतणाव दूर होण्यासाठी इतरांशी त्याविषयी संवाद साधतो. व्यायाम, छंद जोपासणे याचाही फायदा होतो.- डाॅ. पंकज पवार, मनोविकृती चिकित्साशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर