शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

दिल्ली, मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाला वाढली प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:34 IST

१२२ वरून १६२, आता १८२ आसनी विमान

ठळक मुद्देजेट एअरवेज बंदचा परिणाम जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधार

औरंगाबाद : जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानाला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. जेट बंद झाल्यानंतर एअर इंडियाचे १२२ वरून १६२ आसनी विमान येत होते. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमानाचे उड्डाण होत आहे.

जेट एअरवेजच्या सकाळच्या विमानामुळे औरंगाबादकरांना मुंबईमार्गे दिल्लीची हवाई सेवा उपलब्ध होती. या कंपनीच्या विमानसेवेने सकाळच्या वेळेत मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र, २३ मार्चपासून ही विमानसेवा अचानक ठप्प झाली. जेट एअरवेजची विमानसेवा सुरू असताना पूर्वी एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान उड्डाण घेत होते; परंतु जेट बंद होताच एअर इंडियाची प्रत्येक दिवसाच्या जागा आरक्षित होणे सुरू झाले. दिवसेंदिवस प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठे विमान देण्याची विनंती केली होती. अखेर ५ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या १६२ आसनी विमानाने उड्डाण केले. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमान उड्डाण घेत आहे. 

जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधारदिल्ली, मुंबईसाठी एकमेव विमानाचा पर्याय राहिला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी मुंबई, दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे बुकिंग फूल झाल्याचा अनुभव येत आहे. अशावेळी दिल्लीला विमानाने जाण्यासाठी पुणे गाठावे लागते, तर मुंबईसाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो; परंतु रेल्वेचे आरक्षणही मिळत नसल्यामुळे वाहनाने मुंबईला जाण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे. औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या प्रमुख मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची संधी नव्या कंपन्यांना असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले.

बुकिंग : १८२ आसनी विमानाचे उड्डाणएअर इंडियाच्या विमानाचे बुकिंगदेखील वाढत आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुविधेसाठी १६२ आसनी विमान दाखल झाले होते. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली मार्गावर १८२ आसनी विमान उड्डाण घेत असल्याची माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :airplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन