शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील अंशतः लॉकडाऊनने व्यापारी धास्तावले; कोरोना रुग्णसंख्या कमी असल्याने फेरविचाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 19:11 IST

Partial lockdown in Aurangabad District : लॉकडाऊनचा फेरविचार करावा यासाठी पैठण शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ  तहसीलदारांना भेटणार आहे

पैठण : औरंगाबाद शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत  हे खरे असले तरी ग्रामीण भागात मात्र याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने सरसकट संपूर्ण जिल्ह्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यापारी व हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकात मोठी नाराजी पसरली आहे. निर्बंध कडक करा परंतु गरज नसताना लॉकडाऊन लागू करून गरिबांच्या पोटावर मारू नका अशा तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.

प्रशासनाने दि ११ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात प्रत्येक शनिवार व रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे बिघडलेली आर्थिक घडी जेमतेम रुळावर येत असतानाच पुन्हा निर्बंध लागल्याने शेतकरी, व्यापारी व हातावर पोट असलेल्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यात कोरोना रूग्णांचा दैनंदिन अहवाल लक्षात घेतला तर आठवड्यात एक किंवा दोन रूग्ण सापडत आहेत. यामुळे पैठण तालुक्यात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यासारखे ठोस कारण नाही असे व्यापाऱ्यांचे मत आहे. पुन्हा एकदा निर्बंध लागू झाल्यामुळे बहारात आलेला व्यवसाय पुन्हा अडचणीत येणार असल्याने व्यापारी धास्तावले आहेत. 

प्रशासनाने विचार करावापैठण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण संख्या व प्रमाण फारच कमी आहे. लॉकडाऊन मुळे व्यापार व व्यापारावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा फटका बसतो. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन मुळे झालेल्या आर्थिक व मानसिक धक्क्यातून व्यापारी अजून सावरलेले नाही. निर्बंध कडक करा आमची काहीच हरकत नाही. परंतु, लॉकडाऊन बाबत प्रशासनाने फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी दिली.

पगार कपात झाली

शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन आणि सोमवारी पैठण बाजारपेठ बंद असते. यामुळे आठवड्यात तीन दिवस दुकाने बंद राहणार आहे. सध्या व्यवसाय कमी झालेला असून त्यातच असे निर्बंध लागू झाल्याने जवळपास ५०% पगार कपात झाली आहे. या पगारात उदरनिर्वाह कअसा करणार अशी प्रतिक्रिया एका दुकानातील कामगाराने दिली.

जिल्हा प्रशासनास निवेदन देणारलॉकडाऊनचा फेरविचार करावा यासाठी पैठण शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ  तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देणार आहेत अशी माहिती व्यापारी महासंघाचे पवन लोहिया यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद