शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पालक, शिक्षकही झाले सतर्क

By admin | Updated: March 4, 2015 00:22 IST

जालना : शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुले पळविण्याच्या अफवांनी पोलिसांसह पालक आणि शिक्षकही सतर्क झालेले आहेत.

जालना : शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुले पळविण्याच्या अफवांनी पोलिसांसह पालक आणि शिक्षकही सतर्क झालेले आहेत. शहरात दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न झाला, तर अन्य अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत. या सर्व प्रकारांबाबत सत्यता पडताळणी करावी, असा सूर मंगळवारी ‘लोकमत परिचर्चे’ तून निघाला. शहरात २७ फेबु्रवारी रोजी जुना जालन्यात रोशनी लाड व २ मार्च रोजी नवीन जालना भागातील काजल घोरपडे या शालेय विद्यार्थिनीस पळविण्याचा प्रयत्न झाला. या व्यतिरिक्त अन्य काही भागातही अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या. या प्रकारांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तर पोलीस यंत्रणेकडून या सर्व अफवा असल्याचा दावा करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत ‘लोकमत’च्या जालना जिल्हा कार्यालयात झालेल्या परिचर्चेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, शांतीनिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, कदीम जालना ठाण्यातील शांतता कमिटीचे सदस्य गणेश सुपारकर व पालक मनोज लाड यांनी सहभाग नोंदविला.यावेळी बल्लाळ म्हणाले, मुले पळविणारी टोळी किंवा व्यक्तीला कोणीही पाहिलेले नाही. सर्व अफवा उठविल्या जात आहे. घटना घडायची असल्यास ती कोठेही घडू शकते. जालन्यात ज्या दोन घटना (पळविण्याचा प्रयत्न) घडल्या, त्याची सत्यता पडताळणी करण्यात येईल. मुख्याध्यापक गाढवे म्हणाले, या अफवा आहे की, खऱ्या घटना, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. या चर्चेमुळे पालक मात्र सतर्क झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सुपारकर यांनी अशा घटनांची पोलिसांनी सत्यता पडताळून पालकांमध्ये पसरलेली भीती दूर करणे गरजेचे आहे, असे सांगितले. पालक लाड यांनी आपल्या पुतणीला पळविण्याचा प्रयत्न झाला होता, ही बाब खरी असल्याचा दावा केला. त्यामुळे अशा घटना शहरात पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात पसरलेल्या अफवांमुळे पालक, शिक्षक आणि पोलीस ही सर्तक झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांमध्ये विविध शाळांमध्ये कमी असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीप्रमाणे कायम असल्याचे म.स्था. जैन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा श्रीपत यांनी सांगितले. पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक लक्ष देत आहे.