शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:38 IST

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती.

ठळक मुद्देमहापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. कंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी कंपनीसोबत केलेला करार संपुष्टात आणण्यासाठी आणखी रक्कम द्यावी, अन्यथा लवादापुढे जाणार असल्याचा इशारा एसपीएमएल कंपनीने महापालिकेला दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मनपासमोर आता नवीन आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर संकटातून मार्ग काढावा याकरिता हे प्रकरण शासनाकडे सोपविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम एसपीएमएल कंपनीने प्राधान्याने करायचे होते, पण या कामाऐवजी अन्य कामे कंपनीकडून केली जात होती. पीपीपी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनेसाठी जलउपविधी (वॉटर बायलॉज) राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आले, त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ केली जात होती. यामुळे नागरिकांचा समांतर जलवाहिनी योजनेला विरोध वाढला. त्याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एसपीएमएल बरोबरचा पाणीपुरवठा योजनेचा करार रद्द केला.

महापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. त्यानुसार लवादाची स्थापना करण्यात आली. लवादासमोर सुमारे अडीच-तीन वर्षे प्रकरण सुरू होते. त्याचबरोबर सर्वाेच्च न्यायालयातदेखील कंपनीच्या बँक गॅरंटीच्या संदर्भात प्रकरण सुरू होते. हे प्रकरण आपसात तडजोड करुन संपविण्यात आले. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेला आदेश देत कंपनीला २९ कोटी रुपये देण्यास सांगितले. २९ कोटी रुपये मनपाने दिल्यावर लवादासमोरील प्रकरण मागे घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे लवाद संपुष्टात आल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले.

महापालिकेला पुन्हा दिला इशाराकंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली. आता कंपनीने महापालिकेकडे उर्वरित रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम न दिल्यास पुन्हा लवादासमोर जाऊ, असा इशारादेखील दिल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद