शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:38 IST

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती.

ठळक मुद्देमहापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. कंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी कंपनीसोबत केलेला करार संपुष्टात आणण्यासाठी आणखी रक्कम द्यावी, अन्यथा लवादापुढे जाणार असल्याचा इशारा एसपीएमएल कंपनीने महापालिकेला दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मनपासमोर आता नवीन आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर संकटातून मार्ग काढावा याकरिता हे प्रकरण शासनाकडे सोपविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम एसपीएमएल कंपनीने प्राधान्याने करायचे होते, पण या कामाऐवजी अन्य कामे कंपनीकडून केली जात होती. पीपीपी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनेसाठी जलउपविधी (वॉटर बायलॉज) राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आले, त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ केली जात होती. यामुळे नागरिकांचा समांतर जलवाहिनी योजनेला विरोध वाढला. त्याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एसपीएमएल बरोबरचा पाणीपुरवठा योजनेचा करार रद्द केला.

महापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. त्यानुसार लवादाची स्थापना करण्यात आली. लवादासमोर सुमारे अडीच-तीन वर्षे प्रकरण सुरू होते. त्याचबरोबर सर्वाेच्च न्यायालयातदेखील कंपनीच्या बँक गॅरंटीच्या संदर्भात प्रकरण सुरू होते. हे प्रकरण आपसात तडजोड करुन संपविण्यात आले. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेला आदेश देत कंपनीला २९ कोटी रुपये देण्यास सांगितले. २९ कोटी रुपये मनपाने दिल्यावर लवादासमोरील प्रकरण मागे घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे लवाद संपुष्टात आल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले.

महापालिकेला पुन्हा दिला इशाराकंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली. आता कंपनीने महापालिकेकडे उर्वरित रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम न दिल्यास पुन्हा लवादासमोर जाऊ, असा इशारादेखील दिल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद