शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:38 IST

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती.

ठळक मुद्देमहापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. कंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी कंपनीसोबत केलेला करार संपुष्टात आणण्यासाठी आणखी रक्कम द्यावी, अन्यथा लवादापुढे जाणार असल्याचा इशारा एसपीएमएल कंपनीने महापालिकेला दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मनपासमोर आता नवीन आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर संकटातून मार्ग काढावा याकरिता हे प्रकरण शासनाकडे सोपविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम एसपीएमएल कंपनीने प्राधान्याने करायचे होते, पण या कामाऐवजी अन्य कामे कंपनीकडून केली जात होती. पीपीपी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनेसाठी जलउपविधी (वॉटर बायलॉज) राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आले, त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ केली जात होती. यामुळे नागरिकांचा समांतर जलवाहिनी योजनेला विरोध वाढला. त्याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एसपीएमएल बरोबरचा पाणीपुरवठा योजनेचा करार रद्द केला.

महापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. त्यानुसार लवादाची स्थापना करण्यात आली. लवादासमोर सुमारे अडीच-तीन वर्षे प्रकरण सुरू होते. त्याचबरोबर सर्वाेच्च न्यायालयातदेखील कंपनीच्या बँक गॅरंटीच्या संदर्भात प्रकरण सुरू होते. हे प्रकरण आपसात तडजोड करुन संपविण्यात आले. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेला आदेश देत कंपनीला २९ कोटी रुपये देण्यास सांगितले. २९ कोटी रुपये मनपाने दिल्यावर लवादासमोरील प्रकरण मागे घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे लवाद संपुष्टात आल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले.

महापालिकेला पुन्हा दिला इशाराकंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली. आता कंपनीने महापालिकेकडे उर्वरित रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम न दिल्यास पुन्हा लवादासमोर जाऊ, असा इशारादेखील दिल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद