शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पेपर विक्रेत्यांची नेहमीच येते पहाट कष्टाची

By admin | Updated: July 18, 2014 01:48 IST

सितम सोनवणे , लातूर जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावे लागतात़ या कष्टाला सीमा नाही, ते पहायला मिळाले़

सितम सोनवणे , लातूरजीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावे लागतात़ या कष्टाला सीमा नाही, ते पहायला मिळाले़ गुरुवारी पहाटे ४़ ३० वाजता शिवाजी चौकातील उड्डाण पुलाखालील पार्किंगच्या जागेत व एका हॉटेलसमोर आलेल्या वृत्तपत्र घरोघरी पोहोच करणाऱ्या पेपर विके्रत्यांची बारा महिने ही पहाट कष्टाचीच असते़ हे पहायला मिळाले़ या कष्टाला जणू त्यांनी जीवनच समर्पण केले आहे़ दररोजप्रमाणे गुरुवारी पहाटे ४ वाजता फेरफटका मारत असताना शिवाजी चौकात पोहोचलो़ एका हॉटेलवर पाच-सहा तरूण चहा पित होते़ तर काही त्यामध्ये असलेल्या पान टपरीवर पान सुपारीची मागणी करत होते़ शिवाजी चौकातलं वातावरण लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते़ अंबाजोगाई रोडकडून आलेले दोन-तीन आॅटो कॉर्नरवर थांबले़ त्यातल्या एका आॅटोत ‘देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए’ हे गाणं वाजत होतं़ बार्शीे रोडकडून आलेली ट्रॅव्हल्स चौकात थांबली़ काही प्रवाशी उतरले़ त्या पाठोपाठ दोन जीप आल्या़ त्यातील एक उड्डाण पुलाखाली थांबली तर दुसरी अंबाजोगाई रोडकडे जाऊन मध्येच वळून थांबली़ त्या दोन्ही गाड्यातून एक-एक व्यक्ती बाहेर येऊन जीपमधील पेपरचे गठ्ठे खाली टाकायला सुरुवात केली़ पंधरा-वीस गठ्ठे टाकून जीपा परत सुसाट निघुन गेल्या़ पहाटेचा थंड वाराही अंगाला झोंबत होता़ काही वेळाने सायकल, दुचाकीवर माणसांची वर्दळ वाढू लागली़ त्यातील बऱ्याच सायकली उड्डाणपुलाखाली पेपरच्या गठ्ठ्याकडे वळल्या़ तर काही अंबाजोगाई रोडकडील पेपरच्या गठ्ठ्यांकडे वळल्या़ सायकली उभ्या करून पेपरच्या गठ्ठ्यावरील लेबल पाहून आपापले गठ्ठे घेऊन त्यामधील पुरवणी, पत्रके टाकत होती़ बघता बघता उड्डाणपुलाखाली व अंबाजोगाई रोडकडेही ३० ते ४० जणांचा ताफा जमा झाला़ प्रत्येकाची एक वेगळीच घाई चालू होती़ प्रत्येकांची घरेही लांब असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासूनच चौकाकडे येण्याचे नियोजन करत ४ वाजेपर्यंत ते पोहचले होते़ या पेपर विकणाऱ्यांकडेही घरांची विभागणी केलेली दिसली़ त्यात काहींकडे ३०० काहींकडे ७०० घरे असल्याचेही त्यांनी सांगितले़ वाचकांच्या हाती लवकरात लवकर वृत्तपत्र कसे पडेल याचीच घाई त्यांची दिसत होती़ या कामासाठी त्यांना कष्ट मात्र फार घ्यावे लागत होते़ म्हणून ही पहाट त्यांची कष्टाचीच पहाट असते, ही जाणीवही झाली़ याठिकाणी वृत्तपत्र टाकणारे मोहन माने यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले, मागील ३० वर्षांपासून नियमितपणे पहाटे ४ ते १० वाजेपर्यंत ७०० अंक गांधी चौक, पाण्याची टाकी या परिसरात टाकतो़ अंक टाकून झाल्यानंतर राहिलेली वसुली करत राहतो़ यावरच कुटुंबाचा सर्व डोलारा चालतो़ किशन क्षीरसागर, मनोज कुदळे, शेषेराव बिराजदार, मोहन कुदळे, पद्माकर कुलकर्णी, रणजीत कांबळे, लक्ष्मण पेटकर हे मागील २५ ते ३० वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करत असून, पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत वाचकांच्या हाती वृत्तपत्र लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतात़ एक हात नाही म्हणून न बसता ३२ वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करणारे मोहन धर्माधिकारी वाघासारखी एकहाती झुंज देत एका हाताने गाडी चालवत ८०० अंकाचे वितरण करतात, हे त्यांनी सांगितले़