शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

गाळात रुतले तलाव

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत.

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत. या तलावांचा ताबा शासनाने घेतल्याने शहरातील व घाटाखालील शहराच्या शिवेत असलेल्या ११ तलावांत शेकडो वर्षांपासून गाळ साचल्याने तलावातील पाणीसाठा उन्हाळ््यापूर्वीच आटत आहे़ शहरातील पाणीपातळी कमी होत आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याने नगराध्यक्ष राजेंद्र केशवे यांनी पालकमंत्री डी़पी़ सावंत, जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा कृषी अधिकारी संजय पडवळ यांना प्रत्राद्वारे विनंती करून या तलावातील गाळ काढण्याची मागणी केली आहे़ पौराणिक व ऐतिहासिक पुस्तकी उल्लेखाप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माहूर शहराचे अनेकवेळा नामकरणही झाल्याने व येथे अनेक देवदेवता, पीरबाबा, राजे महाराजांनी राज्य केले आहे़ त्या काळात शहर व परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्या निवारणासाठी मोक्याच्या ठिकाणी मालगुजारी तलाव कुंड, जमिनीतील हौद, बारव, विहिरी बांधण्यात आल्या़ ज्या ठिकाणी तलाव बांधले गेले, त्या तलावाखालून झिरपून जाणार्‍या पाण्याच्या स्त्रोतावर विहिरी केल्यामुुळे शहरात पाणीटंचाई जाणवत नव्हती़ जसजसे तलावात गाळ साचत गेला तसे शहरातील विहिरीही आटत गेल्या़ परिणामी शहरात गेल्या दहा वर्षांपासून नळयोजना असूनही पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढीव वस्त्या तयार झाल्याने पाण्याची गरज वाढू लागली़ त्यामुळे नागरिकांनी कुपनलिका खोदण्याचा सपाटा लावला़ त्यामुळे अस्तित्वात असलेल्या नळयोजना कुचकामी ठरल्या व कुपनलिकांमधील पाणी उपशाने जमिनीतील पाणी खालावले आहे़ अक्काला तलाव हे श्रीदत्त शिखर संस्थानच्या मालकी क्षेत्रात असल्याने व पूर्णपणे गाळपल्या गेल्याने तेथे शेती करण्यात येते. हा तलाव उपसून त्यात पाणी साठवल्यास शहरातील संपूर्ण विहिरी कुंड कुपनलिकांना भरमसाठ पाणी वर्षभर राहते अशी माहिती सत्तरी ओलांडलेले नागरिक देतात़ याशिवाय शहरात (भोजंती फुलतळे) असून तेही पूर्णपणे गाळपल्या गेले आहे़ याशिवाय शहरातील श्री जगदंबा हायस्कूल जवळील भानुतीर्थ कुंड स्वच्छ करण्याची गरज असून त्याद्वारे शहरातील कुपनलिका व विहिरींना जमिनीतील स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा होतो़ शहराला लागून घाटाखाली पूर्व बाजूस खंड्याखोरी तलाव, उत्तर बाजूस पांडवलेणी तलाव, उत्तर पश्चिम बाजूस सोनापीर बाबा तलाव, दक्षिण बाजूस गुंडवळ तलाव असून हे तलाव पूर्णपणे गाळपले आहेत़ याशिवाय रेणुकादेवी, श्री दत्त शिखर व कैलास टेकडीच्या मध्ये रामगढ किल्ल्यात अतिपवित्र समजले जाणारे र्इंजाळा तलाव हे भुसभुशीत पहाडाच्या मध्ये अतीउंच ठिकाणावर असल्याने तेही गाळपले आहेत. जंगली श्वापद भाविक पर्यटकांचे आकर्षण असलेले हे तलावही गाळपले असल्याने येथे कावडीद्वारे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. शहरास पर्यटन केंद्रांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तलावातील गाळ काढणे अत्यावश्यक आहे़शहरातील मोहाळा मातृतीर्थ तलावास पौराणिक महत्त्व असल्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तरतूद करण्यात आली. जागमाता तलाव गाळाने पूर्ण भरले असून नागरिक या तलावाचा उपयोग कपडे धुण्यासाठी करत आहेत़ पर्यटन केंद्रास लागून असलेला बाळसमुद्र तलावही मालकी क्षेत्रात असल्याने पूर्णपणे गाळपल्या गेला आहे़