शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

गाळात रुतले तलाव

By admin | Updated: June 1, 2014 00:26 IST

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत.

ईलियास बावाणी, माहूर श्रीक्षेत्र माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत. या तलावांचा ताबा शासनाने घेतल्याने शहरातील व घाटाखालील शहराच्या शिवेत असलेल्या ११ तलावांत शेकडो वर्षांपासून गाळ साचल्याने तलावातील पाणीसाठा उन्हाळ््यापूर्वीच आटत आहे़ शहरातील पाणीपातळी कमी होत आहे़ त्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याने नगराध्यक्ष राजेंद्र केशवे यांनी पालकमंत्री डी़पी़ सावंत, जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा कृषी अधिकारी संजय पडवळ यांना प्रत्राद्वारे विनंती करून या तलावातील गाळ काढण्याची मागणी केली आहे़ पौराणिक व ऐतिहासिक पुस्तकी उल्लेखाप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माहूर शहराचे अनेकवेळा नामकरणही झाल्याने व येथे अनेक देवदेवता, पीरबाबा, राजे महाराजांनी राज्य केले आहे़ त्या काळात शहर व परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्या निवारणासाठी मोक्याच्या ठिकाणी मालगुजारी तलाव कुंड, जमिनीतील हौद, बारव, विहिरी बांधण्यात आल्या़ ज्या ठिकाणी तलाव बांधले गेले, त्या तलावाखालून झिरपून जाणार्‍या पाण्याच्या स्त्रोतावर विहिरी केल्यामुुळे शहरात पाणीटंचाई जाणवत नव्हती़ जसजसे तलावात गाळ साचत गेला तसे शहरातील विहिरीही आटत गेल्या़ परिणामी शहरात गेल्या दहा वर्षांपासून नळयोजना असूनही पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढीव वस्त्या तयार झाल्याने पाण्याची गरज वाढू लागली़ त्यामुळे नागरिकांनी कुपनलिका खोदण्याचा सपाटा लावला़ त्यामुळे अस्तित्वात असलेल्या नळयोजना कुचकामी ठरल्या व कुपनलिकांमधील पाणी उपशाने जमिनीतील पाणी खालावले आहे़ अक्काला तलाव हे श्रीदत्त शिखर संस्थानच्या मालकी क्षेत्रात असल्याने व पूर्णपणे गाळपल्या गेल्याने तेथे शेती करण्यात येते. हा तलाव उपसून त्यात पाणी साठवल्यास शहरातील संपूर्ण विहिरी कुंड कुपनलिकांना भरमसाठ पाणी वर्षभर राहते अशी माहिती सत्तरी ओलांडलेले नागरिक देतात़ याशिवाय शहरात (भोजंती फुलतळे) असून तेही पूर्णपणे गाळपल्या गेले आहे़ याशिवाय शहरातील श्री जगदंबा हायस्कूल जवळील भानुतीर्थ कुंड स्वच्छ करण्याची गरज असून त्याद्वारे शहरातील कुपनलिका व विहिरींना जमिनीतील स्त्रोताद्वारे पाणीपुरवठा होतो़ शहराला लागून घाटाखाली पूर्व बाजूस खंड्याखोरी तलाव, उत्तर बाजूस पांडवलेणी तलाव, उत्तर पश्चिम बाजूस सोनापीर बाबा तलाव, दक्षिण बाजूस गुंडवळ तलाव असून हे तलाव पूर्णपणे गाळपले आहेत़ याशिवाय रेणुकादेवी, श्री दत्त शिखर व कैलास टेकडीच्या मध्ये रामगढ किल्ल्यात अतिपवित्र समजले जाणारे र्इंजाळा तलाव हे भुसभुशीत पहाडाच्या मध्ये अतीउंच ठिकाणावर असल्याने तेही गाळपले आहेत. जंगली श्वापद भाविक पर्यटकांचे आकर्षण असलेले हे तलावही गाळपले असल्याने येथे कावडीद्वारे पाणी आणून भाविकांची तहान भागवावी लागते. शहरास पर्यटन केंद्रांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर तलावातील गाळ काढणे अत्यावश्यक आहे़शहरातील मोहाळा मातृतीर्थ तलावास पौराणिक महत्त्व असल्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तरतूद करण्यात आली. जागमाता तलाव गाळाने पूर्ण भरले असून नागरिक या तलावाचा उपयोग कपडे धुण्यासाठी करत आहेत़ पर्यटन केंद्रास लागून असलेला बाळसमुद्र तलावही मालकी क्षेत्रात असल्याने पूर्णपणे गाळपल्या गेला आहे़