पालम : शहरात मागील दोन दिवसांपासून दिवसभर वीज गायब होत आहे. सतत विजेमध्ये बिघाड होत असल्याने पालमकर हैराण झाले आहेत. विजेअभावी अनेक सेवा कोलमडल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालम शहरात विजेचे नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीचे पेठपिंपळगावलगत कार्यालय आहे. या कार्यालयातून वीजपुरवठा करण्यात येत असतो. तालुकाभर विजेचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी आहेत. मागील चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात वादळी वारे येत आहेत. या वार्यामुळे विजेच्या बिघाडात वाढ झालेली आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसभर शहरातून वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेअभावी अनेक कामे बंद पडली आहेत. सरकारी कार्यालयातील इनर्व्हटर बंद पडल्याने कामकाज होईनासे झाले आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग, तालुका कृषी कार्यालय या कार्यालयात विजेअभावी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. शहरातील व्यापार्यांनाही विजेचा फटका बसलेला आहे. व्यापार्यांची विजेअभावी अडचण होत आहे. झेरॉक्स, संगणक प्रशिक्षण केंद्र, बँका आदी ठिकाणी विजेअभावी यंत्रणा कोलमडली आहे. विजेचा बिघाड अजूनही दुरुस्त झालेला नाही. यामुळे हाल होत आहेत. (प्रतिनिधी)सरकारी कामासाठी ग्रामीण भागातून नागरिक पालम शहरात येत असतात. या नागरिकांची अनेक कामे सरकारी कार्यालयात आहेत. परंतु विजेअभावी शासकीय कार्यालयामधील संगणकीय यंत्रणा बंद पडल्याने कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे. दररोज सकाळी काम होईल या आशेने नागरिक लवकरच येत आहेत. परंतु चार दिवसापांसून विजेची समस्या निर्माण झाल्याने कामे खोळंबली आहेत.
विजेच्या बिघाडामुळे पालमकरांचे हाल
By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST