शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:46 IST

१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले.

छत्रपती संभाजीनगर : जटवाड्यातील जमिनीचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात येऊ लागले आहेत. गेल्या महिन्यात गट नं. १३६ मधील जमिनीच्या फेरफारबाबत तहसील प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या मुदतीची पायमल्ली करीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. महसूल नियमानुसार ३० ते ६० दिवसांचा फेरफार कालावधीची मुदत देखील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी लक्षात न घेतल्यामुळे एवढी घाई कशासाठी केली, यावरून संशयकल्लोळ वाढला आहे. कूळधारकांच्या नावे जमीन होती, तर मग २०११ साली त्या जमिनीचा व्यवहार झाला कसा, १९६५ पासून त्या प्रकरणात फेरफार का झाला नाही. कूळ कायद्यानुसार ही प्रक्रिया केल्याचा तहसील प्रशासनाचा दावा असला तरी फेरफार मुदतीच्या नियमांचे उल्लंघन का केले असा प्रश्न आहे.

तहसिलदारांचे आदेश कायगट नं.१३६ मध्ये २६ जानेवारी १९६५ चे कूळाचे प्रमाणपत्र आहे. तसेच ७/१२ वर शीतल कटारिया यांच्या नावे ९ हेक्टर क्षेत्र होते. त्यांनी मूळ मालक रजिया बेगम युसूफ मिर्झा यांचे वारस सुरय्या बेगम मो. रऊफ यांच्याकडून २०११ मध्ये खरेदी केली. मात्र, ९ हेक्टर जमीन कूळधारक भवनू तुळजाराम यांना हैदराबाद कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० नुसार मिळालेली आहे. १९६५ पूर्वी पासून त्यांचा ताबा होता. त्यांच्या मृत्यूनंतर वारसांचा जमिनीवर ताबा असल्याचे अभिलेखांवरून दिसते आहे. त्यामुळे शीतल कटारिया यांच्या नावावरील ९ हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे कूळधारकाचे नावे फेरफार करण्यात यावे, असे आदेश तहसिलदार रमेश मुंदलोड यांनी गेल्या महिन्यांत दिले. दरम्यान, मुंदलोड यांनी दावा केला की, सदरील प्रकरणात कटारिया यांना आक्षेप नोटीस बजावण्यात आली होती.

कूळ लागणे म्हणजे काय१९४८ मुंबई, १९५० हैदराबाद व विदर्भ कूळ वहिवाट असे तीन कूळ कायदे सध्या आहेत. १९६५ पूर्वी जमीन कसणाऱ्यांच्या नावे कूळ कायद्यानुसार जमिनी झाल्या. साधे कूळ, संरक्षित कूळ व कायम कूळ असे तीन प्रकार यात आहेत. संरक्षित कूळ हे कायद्यानंतर, कायम कूळ कायदा येण्यापूर्वीचे तर साधे कूळ हे तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्रात आहे. कायदा आल्यानंतरच्या सहा वर्षांत जर कसणाऱ्यांनी अर्ज केले तर त्यांचे नाव जमिनीच्या सातबाऱ्यात येते.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर