शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कूळ कायद्यानुसार बदलली मालकी; जटवाड्यातील जमिनीचा फेरफार संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:46 IST

१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले.

छत्रपती संभाजीनगर : जटवाड्यातील जमिनीचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात येऊ लागले आहेत. गेल्या महिन्यात गट नं. १३६ मधील जमिनीच्या फेरफारबाबत तहसील प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या मुदतीची पायमल्ली करीत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. महसूल नियमानुसार ३० ते ६० दिवसांचा फेरफार कालावधीची मुदत देखील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी लक्षात न घेतल्यामुळे एवढी घाई कशासाठी केली, यावरून संशयकल्लोळ वाढला आहे. कूळधारकांच्या नावे जमीन होती, तर मग २०११ साली त्या जमिनीचा व्यवहार झाला कसा, १९६५ पासून त्या प्रकरणात फेरफार का झाला नाही. कूळ कायद्यानुसार ही प्रक्रिया केल्याचा तहसील प्रशासनाचा दावा असला तरी फेरफार मुदतीच्या नियमांचे उल्लंघन का केले असा प्रश्न आहे.

तहसिलदारांचे आदेश कायगट नं.१३६ मध्ये २६ जानेवारी १९६५ चे कूळाचे प्रमाणपत्र आहे. तसेच ७/१२ वर शीतल कटारिया यांच्या नावे ९ हेक्टर क्षेत्र होते. त्यांनी मूळ मालक रजिया बेगम युसूफ मिर्झा यांचे वारस सुरय्या बेगम मो. रऊफ यांच्याकडून २०११ मध्ये खरेदी केली. मात्र, ९ हेक्टर जमीन कूळधारक भवनू तुळजाराम यांना हैदराबाद कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० नुसार मिळालेली आहे. १९६५ पूर्वी पासून त्यांचा ताबा होता. त्यांच्या मृत्यूनंतर वारसांचा जमिनीवर ताबा असल्याचे अभिलेखांवरून दिसते आहे. त्यामुळे शीतल कटारिया यांच्या नावावरील ९ हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे कूळधारकाचे नावे फेरफार करण्यात यावे, असे आदेश तहसिलदार रमेश मुंदलोड यांनी गेल्या महिन्यांत दिले. दरम्यान, मुंदलोड यांनी दावा केला की, सदरील प्रकरणात कटारिया यांना आक्षेप नोटीस बजावण्यात आली होती.

कूळ लागणे म्हणजे काय१९४८ मुंबई, १९५० हैदराबाद व विदर्भ कूळ वहिवाट असे तीन कूळ कायदे सध्या आहेत. १९६५ पूर्वी जमीन कसणाऱ्यांच्या नावे कूळ कायद्यानुसार जमिनी झाल्या. साधे कूळ, संरक्षित कूळ व कायम कूळ असे तीन प्रकार यात आहेत. संरक्षित कूळ हे कायद्यानंतर, कायम कूळ कायदा येण्यापूर्वीचे तर साधे कूळ हे तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्रात आहे. कायदा आल्यानंतरच्या सहा वर्षांत जर कसणाऱ्यांनी अर्ज केले तर त्यांचे नाव जमिनीच्या सातबाऱ्यात येते.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर