शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

१७ वर्षांपासूनचा शेतीचा वाद मिटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:34 IST

गेल्या सतरा वर्षापासून न्याय प्रविष्ट असलेला वाद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी दोन्हीही गटांना बोलावून मध्यस्थी करीत ९ गावांतील शेकडो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत मिटवून वादाला पूर्णविराम दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपोत्रा : गेल्या सतरा वर्षापासून न्याय प्रविष्ट असलेला वाद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी दोन्हीही गटांना बोलावून मध्यस्थी करीत ९ गावांतील शेकडो प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत मिटवून वादाला पूर्णविराम दिला आहे.पोत्रा येथील माहेरवासीन असलेली राधाबाई रुद्राजी बेनगर रा. सापतळी ता. कळमनुरी हिने आपला पती वारल्यानंतर १९८१ ला सापळी येथील गणेश रुद्राजी उर्फ शिवशंकर रामचंद्र बेनगर (४६) या एकुलत्या एक मुलास दत्तक घेतले होते. त्यास आपला संपूर्ण शेतीसहित स्थावर मालमत्ता नावे करून दिली होती. कालांतराने त्या दोघामध्ये किरकोळ भांडण होऊन गणेश बेनगर हा त्यांच्या वडिलाकडे राहायला गेला तर राधाबाई ही आपल्या माहेरी पोत्रा ता. कळमनुरी या गावी राहायला गेली.तब्बल १९ वर्षे राधाबाई हिने आपल्या दत्तक पुत्रास जगविले, वाद विकोपाला गेल्यानंतर संपूर्ण मालमत्ता परत मिळवून दत्तक रद्द करण्यासाठी कळमनुरी येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २००२ साली एकुलता एक पुत्र असल्याने दत्तक रद्द केले. त्यानंतर हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण अपील झाले. २००७ ला पुन्हा न्यायालयाने तोच दत्तक रद्दचा फैसला दिला. पुन्हा गणेश बेनगर यांनी औरंगाबाद येथील खंडपीठात प्रकरण अपील केले. गणेश बेनगर याच्या नावे दत्तक आधार केलेली १९ एकर जमीन होती. दत्तक रद्द करून सदर जमिनीवर स्थगिती आणून ताबा मिळविण्यासाठी राधाबाई यांनी यश प्राप्त केले होते. २८ डिसेंबर २०१६ ला राधाबाई हिचे पोत्रा येथे त्यांचे भाचे विठ्ठलराव बळीराम मुलगीर यांच्या राहत्या घरी निधन झाले. निधनानंतर अत्यंसंस्कार, पाणी पाजवण्यासह इतर विधी विठ्ठल मुलगीर यांनी केल्या. निधनापूर्वीच २०११ ला राधाबाई हिने दुय्यम निबंधकाकडे कायदेशीर मृत्यूपत्र करून संपूर्ण स्थावर मालमत्ता, शेती ही आपले भाचे विठ्ठल बळीराम मुलगीर यांच्या नावे करून दिली होती. वाद वाढतच राहिला. विठ्ठल मुलगीर याने त्या जमिनीवर मनाई हुकूम आणून आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठले.आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दोन्हीही पार्ट्यांना बोलावून संभाव्य काळातील धोक्याच्या घंटेबद्दल माहिती देऊन समजावून सांगून तुम्ही तुमचे नातलग समाजबांधव बोलावून आपसात मिटवून घ्या म्हणून कायदेशीर मार्गदर्शन केले.त्या अनुषंगाने दोन्ही गटांनी आखाडा बाळापूर येथे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नेवरवाडी, बारडवाडी, डोंगरगाव, शेळगाव (महाविष्णू), वंदन, ईरलद, आडगाव, येहळेगाव गवळी, पोत्रा, सापळी येथील प्रतिष्ठीत नामदेव बेनगर, लालजी कलगोंडे, पंडित मिजगर, रामराव मिजगर, प्रकाश मुलगीर, दिगंबर निळे, किशोर मुलगीर, उमाकांत मुलगीर, विजय मुलगीर, गणपत सुकापुरे, शेळगावचे देवीदास मुलगीर, मुकुंद निळे, रघुनाथ पाटील, बालासाहेब व्हरगळ, श्रीकांत मुलगीर, दशरथ मिजगर, उद्धव भोसले, वसंत मुलगीर यांच्यासह शेकडो प्रतिष्ठीत उपस्थित होते.अखेर विठ्ठल मुलगीर यांनी मनाचे मोठेपण आणि औदार्य दाखवून दत्तक पुत्रास चौदा एकर व स्वत: पाच एकर जमीन घेऊन १७ वर्षांच्या वादाला पूर्णविराम दिला.त्यानंतर उपस्थितांच्या वतीने पोलीस निरीक्षकांचा सत्कार करून पेढे वाटले.