शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

By राम शिनगारे | Updated: May 28, 2024 11:59 IST

दहावीच्या निकालातील यश; २७ हजार विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२७ शाळांमधील ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९५.५१ टक्के एवढी असून, ६० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४९ हजार २६१ एवढी असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी दिली. त्यात ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेत डिस्टिंक्शनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही २७ हजार ६४४ एवढी आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुसरा आला आहे. बीड जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९७.७४ टक्के एवढा निकाल लागला. सर्वांत कमी खुलताबाद तालुक्याचा निकाल ९३.९६ टक्के लागला. जिल्ह्याचा निकाल ९५.५१ टक्के लागलेला असतानाच मागील वर्षी हाच निकाल ९३.५८ टक्के होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का वाढला.

वेगवेगळ्या प्रकारांतील विद्यार्थ्यांचे प्रस्तावदहावीच्या परीक्षा देतानाच क्रीडासह प्रकार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येतात. जिल्ह्यातून दिव्यांगांचे २०८ प्रस्ताव विभागीय मंडळाला मिळाले. संपूर्ण विभागांतून ७५१ प्रस्ताव आले. चित्रकलेमध्ये जिल्ह्यातून ४ हजार २१० प्रस्ताव आले. त्यापैकी गुणदानासाठी ४ हजार ३७ प्रस्ताव पात्र ठरले. १७३ अपात्र ठरले. विभागात चित्रकलेचे एकूण १४ हजार ७३० प्रस्ताव दाखल होते. त्यापैकी १४ हजार १३१ प्रस्ताव मंजूर झाले. खेळाडू स्काऊट गाईडचे ८९९ प्रस्ताव आले. त्यापैकी ८५९ प्रस्ताव मंजूर झाले. विभागात एकूण ३ हजार १२ प्रस्ताव आले. त्यापैकी २ हजार ९०१ प्रस्ताव मंजूर झाले.

१४९ गैरप्रकरणांची चौकशीछत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत १४९ गैरमार्गप्रकरणी विभागीय मंडळाने चौकशी केली. त्यापैकी परीक्षा सुरू असताना ८७ आणि परीक्षानंतर ६२ गैरप्रकार उघडकीस आले होते. त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यात ६१ प्रकरणांत विद्यार्थ्यांच्या विषयाचा निकाल रद्द केला, तर ८८ प्रकरणातील विद्यार्थी निर्दोष सोडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दहावीच्या निकालाची आकडेवारीतालुका..................परीक्षार्थी..........डिस्टिंक्शन........प्रथम श्रेणी........द्वितीय श्रेणी.......उत्तीर्ण........एकुण...........टक्केवारीछ.संभाजीनगर........२७,१५१.............९६८०.............९३४६..............५५५५..............१३०९........२५,८९०..........९५.३५गंगापूर....................८८४४................३४७२.............२८७४..............१५७१..............४३९..........८३५६.............९४.४८कन्नड......................५७१२................२३१०.............१९८१.................९५३................१७५...........५४१९............९५.५७खुलताबाद..............२४०२.................१०३५.............७६७.................३५८................९७..............२२५७............९३.९६पैठण.....................५७८७.................२६१६.............१७६२...............८८४................२०७............५४६९.............९४.५०सिल्लोड..................६५१९.................३९८६.............१८०२................५२३................६१...............६३७२.............९७.७४सोयगाव..................१५८४.................६०३................६११...................२५८................३७..............१५०९.............९५.२६वैजापूर....................४७०२................२१२१............१६११..................६७९................१०५.............४५१६..............९६.०४फुलंब्री.....................३१४६.................१८२१.............८६३..................३३६.................४८..............३०६८...............९७.५२एकूण......................६५,८०५..............२७,६४४.........२१,६१७............११,११७.............२४७८.........६२,८५६...........९५.५१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSSC Resultदहावीचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र