शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

...अन्यथा कंटेनरच्या आगीत आलिशान कार झाल्या असत्या भस्मसात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:40 IST

अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले आणि कंटेनरमधील नामांकित कंपन्याच्या आठ आलिशान कार सुरक्षित राहिल्या.

औरंगाबाद : सातारा परिसरातील बीड बायपासवर गुरुवारी पहाटे एका कंटेनरला अचानक आग लागली. अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले आणि कंटेनरमधील नामांकित कंपन्याच्या आठ आलिशान कार सुरक्षित राहिल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.१ ) पहाटे शहरातील एका नामांकित चारचाकी कंपनीमधून आठ अलिशान गाड्या एक कंटेनर अहमदाबादकडे नेत होते. पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी कंटेनर बीडबायपास वर आले असता त्याचे उजव्या बाजूचे एक टायर फुटले. यामुळे चालक कंटेनर थांबवून मागील बाजूस पाहणी करण्यासाठी उतरला. याच दरम्यान कंटेनरच्या कॅबीनमध्ये अचानक स्पार्किंग झाली आणि तिथे आग लागली. क्षणार्धात संपूर्ण कॅबीन आगीच्या विळख्यात आली. 

चालकाने तत्काळ अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत आग कॅबीनपासून मागील कंटेनरकडे पसरली होती. यानंतर अग्निशमन दलाने अर्ध्यातासाच्या अथक मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळवले. हे कंटेनर शहरात असणाऱ्या नामांकित कंपनीच्या आठ गाड्या अहमदाबादकडे नेत होते. अग्निशमन दलाने तत्परतेने आग विझवली अन्यथा या आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या असत्या. यामुळे लाखोंचे नुकसान टळले.  

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल शेषराव चव्हाण व त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास शेषराव चव्हाण हे करत आहेत

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआगcarकार