शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा १५ दिवस लॉकडाऊन; विभागीय आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:59 IST

मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर हालचालींना वेग

ठळक मुद्देनिर्बंध शिथिल केल्याचा गैरफायदा उद्योगांसह सर्व होऊ शकते बंद नवी मुंबईप्रमाणे होऊ शकतो निर्णय

औरंगाबाद :  प्रशासकीय यंत्रणातील बेबनाव, सुविधांची वानवा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यातील अनेक अडचणीशिवाय नागरिकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन, यामुळे शहरासह औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांनी कोरोना नियंत्रणाबाबत नियम पाळले नाहीत, तर आजवर पाहिले नसेल असे लॉकडाऊन १५ दिवस करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊन घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. शिवाय कोरोना नियंत्रणाबाबत विभागीय आयुक्त्त केंद्रेकर यांनी सूत्रे हाती घ्यावीत, असे सुचविले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर आणि औद्योगिक क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे. ५ जूनपासून लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता कोरोना प्रसारासाठी पोषक ठरली असून, औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, अशी प्रशासनाची भावना झाली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सम, विषम पद्धतीने बाजारपेठा सुरू ठेवण्यास विरोध केला. तसेच लॉकडाऊन करण्याची मागणीदेखील केली होती; परंतु यापुढे लॉकडाऊन करण्यात येणार नाही, असे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले होते.  मुख्यमंत्र्यांनीही गुरुवारच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे सूचित केले होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त याबाबत एकत्रित निर्णय घेऊ शकतात आणि लॉकडाऊन कडक पाळले जाणार असेल तर निर्णय व्हावा, कागदावरील लॉकडाऊन करण्यात अर्थ नाही.  कडक लॉकडाऊन करायचे असेल तरच निर्णय घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला बजावले होते. त्या अनुषंगाने कडक लॉकडाऊनच्या हालचालींना वेग आला आहे. आयुक्त केंद्रेकर म्हणाले, रुग्णसंख्या वाढीचा वेग आणि मृत्यूदरात जर काही फरक पडला नाहीतर मोठे लॉकडाऊन करावेच लागणार आहे. लोकांनी ऐकले नाही आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला आले नाहीत तर लॉकडाऊन करावेच लागेल. वेळप्रसंगी औद्योगिक वसाहतींमध्येदेखील लॉकडाऊन करावेच लागेल. मात्र असा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लोकांनी सुधारले पाहिजे, असे ते म्हणाले. 

निर्बंध शिथिल केल्याचा गैरफायदा कोरोनामुळे २२ मार्चपासून बंद असलेला शहराचा गाडा ५ जूनपासून पूर्वपदावर आला खरा, मात्र कोरोनाचे भूत सर्वांच्या मानगुटीवर बसले. सम-विषम पद्धतीने बाजारपेठा सुरू केल्या, त्याचा पूर्णत: फज्जा उडाला. कुठल्याही शिस्तीचे, नियमांचे पालन न करता नागरिक बाहेर पडत आहेत. राज्य शासनाने पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनचे रूप कसे असेल, हे जाहीर करताना काही अटी शिथिल तर काही निर्बंध घातले होते. त्याचे कुठेही पालन झाले नाही.

नवी मुंबईप्रमाणे होऊ शकतो निर्णयनवी मुंबईमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे तिथे दहा कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये २९ जून ते ५ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल, असे तेथील प्रशासनाला वाटत आहे. याच धर्तीवर औरंगाबादमध्ये काही दिवस संपूर्ण लॉकडाऊन राबविता येईल का, याची चाचपणी प्रशासनातर्फे होत आहे. 

वाळूजसाठी स्वतंत्र अधिकारी वाळूज परिसरात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांची नियुक्ती केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक