शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

अवयवदान अभियान लोकचळवळ व्हावी

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

राजेश भिसे , जालना मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करु शकला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत.

राजेश भिसे , जालना मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करु शकला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत. असे असले तरी देशभरात अवयव निकामी होऊन मृत्यूू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. जगभरात अवयवदात्यांची संख्या मोठी आहे. ती देशातही वाढावी, यादृष्टिने केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. राज्यातही ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे तीन दिवस महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान न राहता ती लोकचळवळ झाली तरच अनेकांचे प्राण वाचू शकतील. डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लिहा यासारख्या अवयवांची मनुष्याला अमूल्य भेट मिळालेली आहे. ही निसर्गाने दिलेली अवयवरुपी भेट मृत्यूनंतर इतर गरजू रुग्णांना दान देता येऊ शकते. या अवयवदानाने मृत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देऊ शकतो. सद्यस्थितीत देशात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, पन्नास हजार यकृत, दोन हजारांहून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून, त्यांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुध्दिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुफ्फुस विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना असा कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासाठी हे महाअवयदान अभियान वरदान ठरु शकते. अवयवदानाचे प्रमाण भारतापेक्षा इतर देशांत अधिक असून, त्या देशांची व तेथील जनतेपासून प्रेरणा घेऊन आपणही आता एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे. विचारांच्या जुन्या शृंखला तोडून नव्या विचारांची कास धरली पाहिजे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृती हा अमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाचे महत्त्व कळल्यास त्यासाठी त्यांची संमती सहज मिळू शकेल आणि तेही त्यासाठी प्रेरित होऊ शकतील. मात्र, त्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची. महाअवयवदान अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारनेही कंबर कसली असून, त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अगदी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर अभियान राबविले जाणार असले तरी सामाजिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा या अभियानात सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. भारतात मानुष्याचे अवयव निकामी होण्याचे प्रमाण अलिकडे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यास मानवनिर्मित बाबी कारणीभूत असल्या, तरी त्याचे चर्वितचर्वण करीत बसणे उचित ठरणारे नाही. लोकांची मानसिकता बदलून इतर देशांप्रमाणे आपणही आदर्श जीवन पध्दतीचा स्वीकार केला आहे. मग अवयव दानासारखे पवित्र कार्य करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढे आले पाहिजे. हे राबविताना ‘महा’ विक्रम स्थापित करुन ती लोकचळवळ झाली तरच अभियानाचा उद्देश सफल होईल.