शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उच्च न्यायालयाचा आदेश; परीक्षा केंद्राला ठोठावला लाख रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 06:56 IST

उच्च न्यायालयाचा आदेश; जमिनीवर बसून १२ वी परीक्षा देण्याची गंभीर दखल

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत अतुल कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला तीन आठवड्यांत एक लाख रुपये ‘कॉस्ट’ खंडपीठात जमा करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी हा आदेश दिला. कॉस्ट कमी करण्याची त्यांची विनंती खंडपीठाने नामंजूर करीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान त्यापेक्षा किती तरी पटींनी जास्त असल्याचे स्पष्ट केले.विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीसाठी परीक्षा केंद्रप्रमुख एस. बी. सय्यद आणि उप केंद्रप्रमुख विष्णू मिसाळ हेसुद्धा जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवीत अ‍ॅड. सत्यजित बोरा यांच्या विनंतीनुसार दोघांना प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे निर्देश देत खंडपीठाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे.विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले?कोणतीही व्यक्ती ४० मिनिटे ते एक तासभरच जमिनीवर बसून उत्तरे लिहू शकते. १८ फेब्रुवारीला जमिनीवर बसून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले होते, याचा खुलासाही खंडपीठाने संबंधितांकडून मागविला आहे. अशा अवघड परिस्थितीत विद्यार्थी नापास झाले, तर त्यात त्यांची काहीही चूक नसल्याचे खंडपीठाने मत व्यक्त केले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHigh Courtउच्च न्यायालय