शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हेक्टरी १३ क्विंटल तूर खरेदीच्या आदेशानुसार जाधववाडी केंद्रात खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:37 IST

: जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे अडत बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यातच जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटलच तूर खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आल्याने शेतकरी संतापले होते. अखेर, मंगळवारी शासनाने नवीन आदेश काढले. 

शासनाच्या नवीन आदेशाची प्रत, सायंकाळपर्यंत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाली नव्हती. मात्र, माहिती मिळताच तूर खरेदी केंद्रावर लगेच नवीन आदेशाची अंमलबजावणी करणे सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडीतील कृउबा समितीच्या परिसरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले होते. त्यावेळीस हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदीचे शासनाचे आदेश होते. उद्घाटन सोहळ्यात तूर उत्पादकांनी मागणी केली की, यंदा तुरीचे उत्पादन वाढले आहे. यामुळे तूर खरेदीची मर्यादा वाढून देण्यात यावी. याचे गांभीर्य ओळखून बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सचिवांशी चर्चा केली. त्याचे फलित म्हणजे आज नवीन आदेश काढण्यात आले. त्यात हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे पत्र मार्केट फेडरेशनला मिळाले. त्यांच्याकडून आम्हाला फोनवर माहिती मिळताच आम्ही त्याची दुपारनंतर अंमलबजावणी सुरू केली आहे.  सोमवारी तूर खरेदी केंद्रावर याच मुद्दावर शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला होता. फक्त ५.५ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली, तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला होता. यास ‘लोकमत’ने वाचा फोेडली होती. नवीन आदेश आल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधन व्यक्त केले.

दोन दिवसांत ४८ क्विंटल तूर खरेदी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात दोन दिवसांत ४७ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली. ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला जात आहे. शेतकर्‍यांकडून प्रतिहेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ज्यांनी दोन दिवसांत केंद्रावर तूर विक्री केली त्या शेतकर्‍यांकडून नवीन आदेशानुसार  उर्वरित ७ क्विंटल ९२ किलो तूर खरेदी करण्यात येणार आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद