शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

हेक्टरी १३ क्विंटल तूर खरेदीच्या आदेशानुसार जाधववाडी केंद्रात खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:37 IST

: जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे अडत बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यातच जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटलच तूर खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आल्याने शेतकरी संतापले होते. अखेर, मंगळवारी शासनाने नवीन आदेश काढले. 

शासनाच्या नवीन आदेशाची प्रत, सायंकाळपर्यंत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाली नव्हती. मात्र, माहिती मिळताच तूर खरेदी केंद्रावर लगेच नवीन आदेशाची अंमलबजावणी करणे सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडीतील कृउबा समितीच्या परिसरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले होते. त्यावेळीस हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदीचे शासनाचे आदेश होते. उद्घाटन सोहळ्यात तूर उत्पादकांनी मागणी केली की, यंदा तुरीचे उत्पादन वाढले आहे. यामुळे तूर खरेदीची मर्यादा वाढून देण्यात यावी. याचे गांभीर्य ओळखून बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सचिवांशी चर्चा केली. त्याचे फलित म्हणजे आज नवीन आदेश काढण्यात आले. त्यात हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे पत्र मार्केट फेडरेशनला मिळाले. त्यांच्याकडून आम्हाला फोनवर माहिती मिळताच आम्ही त्याची दुपारनंतर अंमलबजावणी सुरू केली आहे.  सोमवारी तूर खरेदी केंद्रावर याच मुद्दावर शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला होता. फक्त ५.५ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली, तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला होता. यास ‘लोकमत’ने वाचा फोेडली होती. नवीन आदेश आल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधन व्यक्त केले.

दोन दिवसांत ४८ क्विंटल तूर खरेदी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात दोन दिवसांत ४७ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली. ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला जात आहे. शेतकर्‍यांकडून प्रतिहेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ज्यांनी दोन दिवसांत केंद्रावर तूर विक्री केली त्या शेतकर्‍यांकडून नवीन आदेशानुसार  उर्वरित ७ क्विंटल ९२ किलो तूर खरेदी करण्यात येणार आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद