शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आमदार पोहोचण्यापूर्वीच निघाले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा ...

ठळक मुद्दे आमदारांच्या एकजुटीचा परिणाम : सकाळी साडेदहा वाजताच निघाले आदेश

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ गाठले; परंतु ते पोहोचण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे आदेश काढण्यात आले होते. याठिकाणी पोहोचताच त्यांच्या हातात आदेशाची प्रत देण्यात आली. त्यामुळे आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय कोणालाही घेता आले नाही,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी वज्रमूठ आवळली. यावेळी सरकारने समन्यायी पाणीवाटपाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. जायकवाडीच्या पाण्यासाठी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेण्याचा आणि त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णयही बैठकीत झाला. दुसरीकडे याच दिवशी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जायकवाडीत तात्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले.पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या चर्चा आणि प्राधिकरणाच्या निर्देशानंतर मंगळवारी सकाळी आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे हे महामंडळात पोहोचले. याठिकाणी ते पोहोचल्यानंतर त्यांना थेट काढण्यात आलेल्या आदेशाची प्रत देण्यात आली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १०.३० वाजताच आदेश काढले होते. या आदेशाची प्रत या दोन्ही लोकप्रतिनिधींना ११ वाजता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय घेण्यात येणार होते; परंतु थेट आदेशाची प्रतच हातात पडल्याने हा डाव फसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.१५० टीएमसी पाण्यासाठी प्रयत्नजायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे तूर्तास रद्द केले आहे; परंतु १५० टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाईल. त्यासाठीही सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. पाणी सोडण्यासंदर्भातील आदेशाची प्रत घेण्यासाठीच महामंडळात गेलो होतो, असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.

टॅग्स :DamधरणMLAआमदार