शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मंडळाकडे पुनर्नोंदणीसाठी जाचक अटी, २३ हजार कामगारांचा घास हिरावला

By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:44 IST

‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही.

छत्रपती संभाजीनगर : शासकीय जटिल अट, ऑनलाइन नोंदणीचा नियम व लालफितीच्या कारभारामुळेच शहरातील बांधकाम व इतर काम करणाऱ्या सुमारे २३ हजार कामगारांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे योजना?कामगारांचे हित पाहून त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून राज्य शासनाने कोरोनानंतर मजुरांचे स्थलांतर रोखताना व मजुरांची हालअपेष्टा टाळण्यासाठी रोज ‘जेवणाचा डबा’ पोहोचवण्याची सोय केली होती. हा डबा आधी शहरातील सुमारे ३० हजार कामगारांना दिला गेला. त्यावेळी कामगार मंडळाकडे रीतसर ‘कामगार’ म्हणून नोंद असलेल्या ३० हजार जणांचा समावेश झाला. परंतु, दरवर्षी ‘त्या’ नोंदणीचे नूतनीकरण असेल तरच हा डबा मिळेल, ही बाब बहुतांश जणांना कळालीच नाही. यामुळे ३० हजार कामगारांपैकी फक्त २३ हजार कामगारांवर आता यावर्षी उपासमारीची वेळ आली आहे. ही जाचक व जटिल अट ज्यांना समजली व त्यांनाच हा डबा सुरू ठेवता आला आहे, तो आकडा फक्त ७ हजार एवढाच आहे.

कैफियत काय?

जे कामगार ‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही. त्या कार्यालयात जायचे म्हटले की, रोजंदारी बुडते. यामुळे शासनाने कामगारांच्या कामाच्या ठिकाणीच शिबिर घेऊन नूतनीकरणाची मोहीम राबविण्याची गरज आहे. याशिवाय ‘कामगार’ नोंद करताना जी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे तीदेखील लगेच करून मिळावी, अशी माफक अपेक्षा या कामगारांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइलवरील ऑनलाइन प्रक्रिया कशी करायची?कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन करताना त्या बिचाऱ्या कामगारांना या बाबी कळत नसल्याने ही प्रक्रिया सुलभ व सोपी करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. हंगामी मजुरांना फोन फक्त संपर्कासाठी असतो. अनेकांकडे मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासाठीही पैसे नसतात, त्यांना मोबाइलवर आलेला संदेश वाचताच येत नाही. मग ते ऑनलाइन कागदपत्र करण्यासाठी जाण्यास असमर्थ असतात. त्यांच्याकडून अनेकजण कागदपत्रांच्या नावाखाली फेऱ्या मारण्यास भाग पाडतात. फेऱ्या मारण्यात त्यांचा वेळ जातो अन् हातचे कामही जाते, असे दुहेरी आर्थिक नुकसान बांधकाम मजुरांना सोसावे लागते. यामुळे उपासमारीची वेळ येते. त्यामुळे कामगार कार्यालयानेच शिबिर घेऊन मजुरांची सोय करावी.- प्रेम चव्हाण, कामगार नेते

नियमानुसार नूतनीकरण हवेच...बांधकाम मजूर येथे आहे की, स्थलांतरित झाला. या नोंदीसह अजून बऱ्याच किरकोळ बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनदरबारी याचे टीपण करावे लागते. यासाठी दरवर्षी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. सध्या केवळ ७ हजार कामगारांचे टीपण आमच्याकडे आहे. जशीजशी कामगार नोंदणी वाढेल, तसे डबेही वाढतील.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त, कामगार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद