शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाकडे पुनर्नोंदणीसाठी जाचक अटी, २३ हजार कामगारांचा घास हिरावला

By साहेबराव हिवराळे | Updated: July 22, 2023 18:44 IST

‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही.

छत्रपती संभाजीनगर : शासकीय जटिल अट, ऑनलाइन नोंदणीचा नियम व लालफितीच्या कारभारामुळेच शहरातील बांधकाम व इतर काम करणाऱ्या सुमारे २३ हजार कामगारांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे योजना?कामगारांचे हित पाहून त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून राज्य शासनाने कोरोनानंतर मजुरांचे स्थलांतर रोखताना व मजुरांची हालअपेष्टा टाळण्यासाठी रोज ‘जेवणाचा डबा’ पोहोचवण्याची सोय केली होती. हा डबा आधी शहरातील सुमारे ३० हजार कामगारांना दिला गेला. त्यावेळी कामगार मंडळाकडे रीतसर ‘कामगार’ म्हणून नोंद असलेल्या ३० हजार जणांचा समावेश झाला. परंतु, दरवर्षी ‘त्या’ नोंदणीचे नूतनीकरण असेल तरच हा डबा मिळेल, ही बाब बहुतांश जणांना कळालीच नाही. यामुळे ३० हजार कामगारांपैकी फक्त २३ हजार कामगारांवर आता यावर्षी उपासमारीची वेळ आली आहे. ही जाचक व जटिल अट ज्यांना समजली व त्यांनाच हा डबा सुरू ठेवता आला आहे, तो आकडा फक्त ७ हजार एवढाच आहे.

कैफियत काय?

जे कामगार ‘कामगार’ असल्याची नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मंडळाकडे जायला पाहिजे, त्यांना रोजंदारी सोडून तेथे जाणे शक्य होत नाही. त्या कार्यालयात जायचे म्हटले की, रोजंदारी बुडते. यामुळे शासनाने कामगारांच्या कामाच्या ठिकाणीच शिबिर घेऊन नूतनीकरणाची मोहीम राबविण्याची गरज आहे. याशिवाय ‘कामगार’ नोंद करताना जी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे तीदेखील लगेच करून मिळावी, अशी माफक अपेक्षा या कामगारांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइलवरील ऑनलाइन प्रक्रिया कशी करायची?कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन करताना त्या बिचाऱ्या कामगारांना या बाबी कळत नसल्याने ही प्रक्रिया सुलभ व सोपी करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. हंगामी मजुरांना फोन फक्त संपर्कासाठी असतो. अनेकांकडे मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासाठीही पैसे नसतात, त्यांना मोबाइलवर आलेला संदेश वाचताच येत नाही. मग ते ऑनलाइन कागदपत्र करण्यासाठी जाण्यास असमर्थ असतात. त्यांच्याकडून अनेकजण कागदपत्रांच्या नावाखाली फेऱ्या मारण्यास भाग पाडतात. फेऱ्या मारण्यात त्यांचा वेळ जातो अन् हातचे कामही जाते, असे दुहेरी आर्थिक नुकसान बांधकाम मजुरांना सोसावे लागते. यामुळे उपासमारीची वेळ येते. त्यामुळे कामगार कार्यालयानेच शिबिर घेऊन मजुरांची सोय करावी.- प्रेम चव्हाण, कामगार नेते

नियमानुसार नूतनीकरण हवेच...बांधकाम मजूर येथे आहे की, स्थलांतरित झाला. या नोंदीसह अजून बऱ्याच किरकोळ बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनदरबारी याचे टीपण करावे लागते. यासाठी दरवर्षी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. सध्या केवळ ७ हजार कामगारांचे टीपण आमच्याकडे आहे. जशीजशी कामगार नोंदणी वाढेल, तसे डबेही वाढतील.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त, कामगार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद